शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

बोडी कामावरून मजूर परत पाठविले

By admin | Updated: May 27, 2014 23:42 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही.

मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही. आरमोरी पंचायत समितीच्या महिला सदस्यांनी आपल्या शेतावरील बोडीवरील माती कामावरून मजूर परत पाठविल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधींच्या या कार्यपद्धतीमुळे आपण कामापासून वंचित राहिल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी की, आरमोरी पंचायत समितीच्या सदस्य व पिसेवडधा येथील रहिवासी इंदिरा मोहुर्ले यांच्या स्वमालकीच्या बोडीवर मातीकाम करण्यासाठी ३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला. पंचायत समितीमधून पिसेवडधा ग्रामपंचायतीला कामाचे आदेशही मंजूर झाले. रोजगार सेवकाने यादीही प्रसिद्ध केली. २४ जून २0१४ रोजी मजुरांना या कामावर पाठविण्यात आले. प्रत्यक्ष बोडीवर कामासाठी पोहोचल्यावर पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी मजुरांना काम करू देण्यास मज्जाव केला. त्यामुळे मजूर सतंप्त झाले. आपल्या तोंडचा रोजगार हिरावला, असा रोष त्यांनी व्यक्त केला. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांची समजूत घालत हे प्रकरण निस्तारले. या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी हरिष सहारे, विनोद भोयर, खुशाल आत्राम यांनी केली आहे.

यासंदर्भात लोकमतने पंचायत समितीचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी गोपावार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. मात्र पंचायत समिती सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी सांगितले की, मी जेव्हा पं. स. सदस्य पदावर नव्हते तेव्हा माझ्या स्वमालकीच्या बोडीवर माती टाकण्याच्या कामाची मागणी २0१२-१३ मध्ये केली होती. त्यावेळी मागणी करून काम झाले नाही. परंतु जुन्या अर्जावर रोहयोतून मातीकाम मंजूर झाले. शासकीय पदावर असतांना आपण निधीतून लाभाचे काम करून घेणे योग्य नाही, असे आपले मत आहे. याबाबत जनताही आक्षेप घेऊ शकते व आपले पं. स. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. या कारणाने आलेल्या मजुरांना मी काम करू देण्यास मज्जाव केला, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र मजूर रोहयोच्या कामापासून आपल्याला वंचित करण्यात आला आहे, याची दखल घेण्यात यावी, असा आरोप करीत आहे.

या भागात आधीच काम नाहीत. शासनाने रोहयोच्या माध्यमातून काढलेले कामामुळे चार ते पाच दिवसाची मजुरी मिळाली असती. ते कामही रोखण्यात आले. त्यामुळे आता मजुरांवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे, अशी माहिती मजुरांनी दिली आहे. (वार्ताहर)