शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बोडी कामावरून मजूर परत पाठविले

By admin | Updated: May 27, 2014 23:42 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही.

मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही. आरमोरी पंचायत समितीच्या महिला सदस्यांनी आपल्या शेतावरील बोडीवरील माती कामावरून मजूर परत पाठविल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधींच्या या कार्यपद्धतीमुळे आपण कामापासून वंचित राहिल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी की, आरमोरी पंचायत समितीच्या सदस्य व पिसेवडधा येथील रहिवासी इंदिरा मोहुर्ले यांच्या स्वमालकीच्या बोडीवर मातीकाम करण्यासाठी ३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला. पंचायत समितीमधून पिसेवडधा ग्रामपंचायतीला कामाचे आदेशही मंजूर झाले. रोजगार सेवकाने यादीही प्रसिद्ध केली. २४ जून २0१४ रोजी मजुरांना या कामावर पाठविण्यात आले. प्रत्यक्ष बोडीवर कामासाठी पोहोचल्यावर पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी मजुरांना काम करू देण्यास मज्जाव केला. त्यामुळे मजूर सतंप्त झाले. आपल्या तोंडचा रोजगार हिरावला, असा रोष त्यांनी व्यक्त केला. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांची समजूत घालत हे प्रकरण निस्तारले. या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी हरिष सहारे, विनोद भोयर, खुशाल आत्राम यांनी केली आहे.

यासंदर्भात लोकमतने पंचायत समितीचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी गोपावार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. मात्र पंचायत समिती सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी सांगितले की, मी जेव्हा पं. स. सदस्य पदावर नव्हते तेव्हा माझ्या स्वमालकीच्या बोडीवर माती टाकण्याच्या कामाची मागणी २0१२-१३ मध्ये केली होती. त्यावेळी मागणी करून काम झाले नाही. परंतु जुन्या अर्जावर रोहयोतून मातीकाम मंजूर झाले. शासकीय पदावर असतांना आपण निधीतून लाभाचे काम करून घेणे योग्य नाही, असे आपले मत आहे. याबाबत जनताही आक्षेप घेऊ शकते व आपले पं. स. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. या कारणाने आलेल्या मजुरांना मी काम करू देण्यास मज्जाव केला, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र मजूर रोहयोच्या कामापासून आपल्याला वंचित करण्यात आला आहे, याची दखल घेण्यात यावी, असा आरोप करीत आहे.

या भागात आधीच काम नाहीत. शासनाने रोहयोच्या माध्यमातून काढलेले कामामुळे चार ते पाच दिवसाची मजुरी मिळाली असती. ते कामही रोखण्यात आले. त्यामुळे आता मजुरांवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे, अशी माहिती मजुरांनी दिली आहे. (वार्ताहर)