शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बोडी कामावरून मजूर परत पाठविले

By admin | Updated: May 27, 2014 23:42 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही.

मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही. आरमोरी पंचायत समितीच्या महिला सदस्यांनी आपल्या शेतावरील बोडीवरील माती कामावरून मजूर परत पाठविल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधींच्या या कार्यपद्धतीमुळे आपण कामापासून वंचित राहिल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी की, आरमोरी पंचायत समितीच्या सदस्य व पिसेवडधा येथील रहिवासी इंदिरा मोहुर्ले यांच्या स्वमालकीच्या बोडीवर मातीकाम करण्यासाठी ३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला. पंचायत समितीमधून पिसेवडधा ग्रामपंचायतीला कामाचे आदेशही मंजूर झाले. रोजगार सेवकाने यादीही प्रसिद्ध केली. २४ जून २0१४ रोजी मजुरांना या कामावर पाठविण्यात आले. प्रत्यक्ष बोडीवर कामासाठी पोहोचल्यावर पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी मजुरांना काम करू देण्यास मज्जाव केला. त्यामुळे मजूर सतंप्त झाले. आपल्या तोंडचा रोजगार हिरावला, असा रोष त्यांनी व्यक्त केला. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांची समजूत घालत हे प्रकरण निस्तारले. या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी हरिष सहारे, विनोद भोयर, खुशाल आत्राम यांनी केली आहे.

यासंदर्भात लोकमतने पंचायत समितीचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी गोपावार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. मात्र पंचायत समिती सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी सांगितले की, मी जेव्हा पं. स. सदस्य पदावर नव्हते तेव्हा माझ्या स्वमालकीच्या बोडीवर माती टाकण्याच्या कामाची मागणी २0१२-१३ मध्ये केली होती. त्यावेळी मागणी करून काम झाले नाही. परंतु जुन्या अर्जावर रोहयोतून मातीकाम मंजूर झाले. शासकीय पदावर असतांना आपण निधीतून लाभाचे काम करून घेणे योग्य नाही, असे आपले मत आहे. याबाबत जनताही आक्षेप घेऊ शकते व आपले पं. स. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. या कारणाने आलेल्या मजुरांना मी काम करू देण्यास मज्जाव केला, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र मजूर रोहयोच्या कामापासून आपल्याला वंचित करण्यात आला आहे, याची दखल घेण्यात यावी, असा आरोप करीत आहे.

या भागात आधीच काम नाहीत. शासनाने रोहयोच्या माध्यमातून काढलेले कामामुळे चार ते पाच दिवसाची मजुरी मिळाली असती. ते कामही रोखण्यात आले. त्यामुळे आता मजुरांवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे, अशी माहिती मजुरांनी दिली आहे. (वार्ताहर)