शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आवश्यक कामासाठी जाणाऱ्यांना गावबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर वस्तू टाकून मार्ग अडविण्यास सुरूवात केली आहे. जो रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज; मुख्य मार्ग अडविल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या गावातील कोरोनाग्रस्त गावात येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही गावकऱ्यांनी गावाकडे जाणारे रस्ते अडविले आहेत. यातील काही रस्ते मुख्य रस्ते असून ते गावातून जातात. गावकऱ्यांनी रस्ता अडविल्यामुळे आवश्यक कामांसाठी जाणाºयांची अडचण निर्माण होत आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे.कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर वस्तू टाकून मार्ग अडविण्यास सुरूवात केली आहे. जो रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित आहे. अशा गावाचा रस्ता अडविला तर फारसा फरक पडणार नाही. गावकºयांची परवानगी घेतल्यानंतर सदर व्यक्ती गावात जाऊ शकते. मात्र काही गावांच्या अगदी मधून मुख्य रस्ते गेले आहेत. सदर रस्ते पुढे अनेक गावांना जोडतात. त्यामुळे या रस्त्यांनी अनेक गावची शेकडो नागरिक ये-जा करतात. संचारबंदी लागू केली असली तरी आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याची मुभा नागरिकांना दिली आहे. तसेच सिलिंडर भरणे, भाजीपाला, किराणा, पेट्रोल खरेदी, दवाखाना आदी कामांसाठी बाहेर पडता येते. मात्र गावकऱ्यांनी मुख्य रस्ता अडविल्याने इतर गावातील नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष घालून मुख्य मार्ग अडविले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्हा सीमांवर कडक नाकेबंदीएका जिल्ह्यातील व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा सीमांवर दोन्ही जिल्ह्यांच्या बाजुने पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. तहसीलदार यांची परवानगी असल्याशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. रूग्ण गंभीर असल्याशिवाय तहसीलदार परवानगी देत नाही. त्यामुळे जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस