शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यक कामासाठी जाणाऱ्यांना गावबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर वस्तू टाकून मार्ग अडविण्यास सुरूवात केली आहे. जो रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज; मुख्य मार्ग अडविल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या गावातील कोरोनाग्रस्त गावात येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही गावकऱ्यांनी गावाकडे जाणारे रस्ते अडविले आहेत. यातील काही रस्ते मुख्य रस्ते असून ते गावातून जातात. गावकऱ्यांनी रस्ता अडविल्यामुळे आवश्यक कामांसाठी जाणाºयांची अडचण निर्माण होत आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे.कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर वस्तू टाकून मार्ग अडविण्यास सुरूवात केली आहे. जो रस्ता केवळ एका गावापुरता मर्यादित आहे. अशा गावाचा रस्ता अडविला तर फारसा फरक पडणार नाही. गावकºयांची परवानगी घेतल्यानंतर सदर व्यक्ती गावात जाऊ शकते. मात्र काही गावांच्या अगदी मधून मुख्य रस्ते गेले आहेत. सदर रस्ते पुढे अनेक गावांना जोडतात. त्यामुळे या रस्त्यांनी अनेक गावची शेकडो नागरिक ये-जा करतात. संचारबंदी लागू केली असली तरी आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याची मुभा नागरिकांना दिली आहे. तसेच सिलिंडर भरणे, भाजीपाला, किराणा, पेट्रोल खरेदी, दवाखाना आदी कामांसाठी बाहेर पडता येते. मात्र गावकऱ्यांनी मुख्य रस्ता अडविल्याने इतर गावातील नागरिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष घालून मुख्य मार्ग अडविले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्हा सीमांवर कडक नाकेबंदीएका जिल्ह्यातील व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा सीमांवर दोन्ही जिल्ह्यांच्या बाजुने पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. तहसीलदार यांची परवानगी असल्याशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नाही. रूग्ण गंभीर असल्याशिवाय तहसीलदार परवानगी देत नाही. त्यामुळे जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस