शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

बारसेवाडा जंगलात भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:41 IST

तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देउपाययोजना करण्याची मागणी : मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.एटापल्ली तालुक्यात गौण वनोपज व मौल्यवान वनस्पतींची भरमार आहे. तालुका अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असल्याने या तालुक्याचा विकास करण्याकडे शासन, प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. तालुक्यातील जंगलात सागवान, येन, आंजन, बेहडा, तेंदू, मोहा, चारोळी यासह विविध प्रजातींची वनस्पती आहे. मागील काही दिवसांपासून मोहफूल संकलनाचे काम सुरू असल्याने अनेक नागरिक मोहाच्या झाडाखालील पालापाचोळा जाळतात. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचे हळूहळू मोठ्या आगीत रूपांतर होते. बुधवार २७ मार्चला भर दुपारी बारसेवाडाच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. जंगलात सर्वत्र पालापाचोळा असल्याने ही आग सर्वदूर पसरल्याचे दिसून आली. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली असल्याने दुपारी तीव्र उन्हाच्या हवेचा झोका येत असल्याने परिसरात वणवा असल्यास अन्य ठिकाणी आग लागण्याची शक्यता अधिक असते. वन व वन्यजीवांची हानी रोखण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करून कार्यवाही करावी, अशी मागणी बारसेवाडा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :forestजंगलfireआग