शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

बारसेवाडा जंगलात भडकला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:41 IST

तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देउपाययोजना करण्याची मागणी : मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.एटापल्ली तालुक्यात गौण वनोपज व मौल्यवान वनस्पतींची भरमार आहे. तालुका अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असल्याने या तालुक्याचा विकास करण्याकडे शासन, प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. तालुक्यातील जंगलात सागवान, येन, आंजन, बेहडा, तेंदू, मोहा, चारोळी यासह विविध प्रजातींची वनस्पती आहे. मागील काही दिवसांपासून मोहफूल संकलनाचे काम सुरू असल्याने अनेक नागरिक मोहाच्या झाडाखालील पालापाचोळा जाळतात. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचे हळूहळू मोठ्या आगीत रूपांतर होते. बुधवार २७ मार्चला भर दुपारी बारसेवाडाच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. जंगलात सर्वत्र पालापाचोळा असल्याने ही आग सर्वदूर पसरल्याचे दिसून आली. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली असल्याने दुपारी तीव्र उन्हाच्या हवेचा झोका येत असल्याने परिसरात वणवा असल्यास अन्य ठिकाणी आग लागण्याची शक्यता अधिक असते. वन व वन्यजीवांची हानी रोखण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करून कार्यवाही करावी, अशी मागणी बारसेवाडा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :forestजंगलfireआग