शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी.

ठळक मुद्देअनेकांचे टीकास्त्र : जिल्हा मुख्यालयासह ११ तालुकास्थळी धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जनादेशाचा अनादर करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवर अत्यावर वाढले आहेत, असे आरोप करून सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने गडचिरोलीसह सर्व तालुकास्थळी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणावर टिकास्त्र सोडून असंतोष व्यक्त केला.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. यानंतर तहसीलदरांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. गडचिरोलीतील धरणे आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, उपसभापती विलास दशमुखे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक केशव निंबोड, माजी शहराध्यक्ष सुधाकरराव येनगंधलवार, माजी तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगरसेविका अल्का पोहनकर, अनिता विश्रोजवार, वर्षा बट्टे, लता लाटकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गा मंगर, शहराध्यक्ष पल्लवी बारापात्रे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, सिध्दार्थ नंदेश्वर, गजेंद्र मेश्राम, नरेश हजारे, निलीमा राऊत, अविनाश विश्रोजवार, देवाजी लाटकर, गोवर्धन चव्हाण, डेडूजी राऊत, युवराज बोरकुटे, लोमेश नामदेव कोलते, हेमंत बोरकुटे, उपेंद्र रोहणकर, रामन्ना बोनकुलवार, प्रतिभा चौधरी, पुनम हेमके यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याराज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी. नोकर भरती पोर्टल पुर्ववत सुरू करावे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा. बिंदूनामावलीवरील स्थगिती उठविण्यात यावी. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे. थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपा