शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

आघाडी सरकारविरोधात भाजपचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी.

ठळक मुद्देअनेकांचे टीकास्त्र : जिल्हा मुख्यालयासह ११ तालुकास्थळी धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जनादेशाचा अनादर करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवर अत्यावर वाढले आहेत, असे आरोप करून सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने गडचिरोलीसह सर्व तालुकास्थळी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणावर टिकास्त्र सोडून असंतोष व्यक्त केला.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. यानंतर तहसीलदरांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. गडचिरोलीतील धरणे आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, उपसभापती विलास दशमुखे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक केशव निंबोड, माजी शहराध्यक्ष सुधाकरराव येनगंधलवार, माजी तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगरसेविका अल्का पोहनकर, अनिता विश्रोजवार, वर्षा बट्टे, लता लाटकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गा मंगर, शहराध्यक्ष पल्लवी बारापात्रे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, सिध्दार्थ नंदेश्वर, गजेंद्र मेश्राम, नरेश हजारे, निलीमा राऊत, अविनाश विश्रोजवार, देवाजी लाटकर, गोवर्धन चव्हाण, डेडूजी राऊत, युवराज बोरकुटे, लोमेश नामदेव कोलते, हेमंत बोरकुटे, उपेंद्र रोहणकर, रामन्ना बोनकुलवार, प्रतिभा चौधरी, पुनम हेमके यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याराज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी, फळबागधारक शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी. महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी. जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालू करण्यात यावी. नोकर भरती पोर्टल पुर्ववत सुरू करावे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यावा. बिंदूनामावलीवरील स्थगिती उठविण्यात यावी. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे. थेट जनतेतून सरपंच व नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टॅग्स :BJPभाजपा