शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भाजपने केला गड सर

By admin | Updated: May 17, 2014 00:13 IST

गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, नाग विदर्भ आंदोलन समिती, रिपाइं (आठवले) व युवाशक्ती आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते ..

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, नाग विदर्भ आंदोलन समिती, रिपाइं (आठवले) व युवाशक्ती आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपा आघाडीचे उमेदवार गडचिरोलीचे काँग्रेस आमदार डॉ. नामदेवराव दल्लुजी उसेंडी यांचा तब्बल २ लाख ३६ हजार ९७0 मतांनी पराभव केला व काँग्रेसकडे असलेला हा मतदार संघ भाजपाने आपल्या कब्ज्यात घेतला.

सकाळी ८ वाजता इंदाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली. पोस्टल मतमोजणीपासूनच आघाडीवर असलेल्या भाजप उमेदवार अशोक नेते यांनी शेवटच्या २६ व्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायमच ठेवली. गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चिमूर, ब्रम्हपूरी, आमगाव या सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये अशोक नेते यांनी प्रचंड आघाडी मिळवित काँग्रेस उमेदवाराचे पाणीपत केले.

अशोक नेते यांना ५ लाख ३५ हजार ९८२, काँग्रेस डॉ. नामदेव उसेंडी यांना २ लाख ९९ हजार ११२ तर बसपाचे रामराव नन्नावरे यांना ६६ हजार ९0६, आम आदमी पक्षाचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना ४५ हजार ४५८ मते मिळाली. भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे प्रा. नामदेव कन्नाके यांना २२ हजार ५१२ मते मिळाली. तर बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर पेंदाम यांना ३ हजार ७३0, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना ६ हजार ६0६, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अँड. प्रभाकर दडमल यांना ३ हजार ४२२, समाजवादी पार्टीचे विनोद नन्नावरे यांना ४ हजार २८७, तृणमूल काँग्रेसचे सतीश पेंदाम यांना ८ हजार १५६ तर अपक्ष बाबुराव दांडेकर यांना ६ हजार ४७0 यांना मते मिळाली. अशोक नेते यांना आमगाव विधानसभा क्षेत्रात २६ हजार ६२ मतांची आघाडी मिळाली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ४२ हजार ६७७, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ६९ हजार ९, अहेरी विधानसभा क्षेत्रात ४३,६७३, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात ३0,१६७, चिमूर विधानसभा क्षेत्रात २५,0५२ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीच्या भरवशावर भाजपच्या ऐतिहासीक विजयाचा मार्ग सुकर झाला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. उसेंडी यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)