शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 23:58 IST

यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात रविवार १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयात झाली. यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा तालुक्यातील कामतळा येथे सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नसल्याने हे सरपंचपद रिक्त राहिले.पाच ठिकाणी अविराेध निवड झाली. त्यात धानाेरा तालुक्यातील जप्पी, कामतळा आणि लेखा तसेच आरमाेरी तालुक्यातील नरचुली आणि एटापल्ली तालुक्यातील काेटमी येथील निवडणूक अविराेध झाली. कामतळा येथे सरपंचपद रिक्त आहे.

अनंती पदा ठरल्या जांभळीच्या पहिल्या सरपंच

    आरमोरी तालुक्यातील नरचुली ग्रामपंचायतचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या जांभळी ग्रामपंचायतच्या  पहिल्याच सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान काँग्रेसप्रणित उमेदवार अनंती मनिराम पदा यांना मिळाला. या निवडणुकीत  आरमोरी पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता जीवनदास उसेंडी यांना पराभव पत्करावा लागला.     आरमोरी तालुक्यातील नरचुली व जांभळी या दोन ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये नरचुली येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे अविरोध निवडून आले. जांभळी ग्रामपंचायतचे सर्व सात सदस्य अविरोध निवडून आले. मात्र सरपंचपदासाठी एकमत झाले नाही.    जांभळी ग्रामपंचायतच्या पहिल्या सरपंचपदासाठी १६ ऑक्टोबरला निवडणूक  घेण्यात आली. त्याचा निकाल  मंगळवारी सकाळी  जाहीर झाला. यामध्ये माजी पं. स. सभापती बग्गू ताडाम यांच्या गटाला धक्का बसला.  पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता उसेंडी यांचा पराभव झाला तर रामचंद्र टेकाम गटाच्या अनंती मनिराम पदा या निवडून आल्या.अनंती पदा यांना  ४६९ मते मिळाली तर बबिता उसेंडी  यांना ३६४  मते मिळाली.     नोटावर २३ उमेदवारांनी पसंती दर्शविली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एस. मडावी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ए. आर. मेंढे यांनी काम पाहिले. तालुक्यात निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि कुठेही गडबड न हाेता पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास साेडला. 

एटापल्लीत आविसंचे वर्चस्व

-    एटापल्ली तालुक्यातील कोहका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदिवासी विद्यार्थी संघ तथा ग्रामसभेचे वर्चस्व आले आहे. एकूण सात सदस्यीय ग्रामपंचायतीत आविसचे अंतू बारसा यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच व ५ सदस्य अशा एकूण सहा जागांकरिता ही निवडणूक झाली. -    कोटमी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. या ठिकाणीही आविसबहुल सरपंच निवडल्या गेल्याचा दावा केला जात आहे. सरपंचपदाकरीता आविसं तथा ग्रामसभेकडून वनिता संजय हिचामी आणि भाजपाचे सुनीता बंडू नरोठे उभे होते. आविसंच्या वनिता हिचामी ३६१, तर भाजपाच्या सुनीता नरोठे यांना २८७ मते मिळाली. नोटावर तब्बल ६८ मते पडली. -    सपना अंताराम पुगांटी, शिलो सनकू दुग्गा, अशोक जयराम मडावी, लता गणू पुंगाटी, नाना रावजी कडयामी, जनली दिवाकर नरोठे हे विजयी झाले. आविसंला सर्वाधिक ४ जागा मिळाल्याने एकहाती सत्ता आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, नंदू मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वल नागूलवार, मंगेश हलामी, मनिराम हिचामी, सुधाकर टेकाम यांच्यासह आविस व ग्रामसभेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

घोटमध्ये रूपाली दुधबावरे, तर दुर्गापूरमध्ये सोनी मंडल सरपंच

-    चामोर्शी तालुक्यातील घाेट व दुर्गापूर या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली. दोनही ठिकाणी भाजपबहुल उमेदवार विजयी झाल्या आहेत. थेट मतदारांकडून सरपंचाची निवड असल्याने याबाबत उत्सुकता होती.  -    घोटच्या सरपंचपदी अनुसूचित जाती प्रवर्गातून व थेट जनतेतून रूपाली प्रशांत दुधबावरे निवडून आल्या. त्या ३३२१ पैकी १४४७ मतांनी विजयी झाल्या. याशिवाय दुर्गापूरच्या सरपंचपदी नामाप्र (स्त्री) राखीव गटातून सोनी दिनेश मंडल यांनी २१७२ मतांपैकी १०९८ मते घेऊन सरपंचपदासाठी बाजी मारली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक