शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गडचिरोलीतील चामोर्शी व सिरोंचात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:27 IST

राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत जंगलाबरोबरच मुलींचेही संगोपनअभिमानास्पद बाब

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय आदिवासीबहुल आणि मागास अशा गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यातील अनेक जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे.मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी मागील पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच शासन मुलींसाठी विविध योजना राबवित आहे. त्यामुळे े‘मुलगा हा वंशाचा दिवा’ ही संकल्पना मागे पडून ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ ही संकल्पना रूढ होत चालली आहे. तसेही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मुलगा व मुलगी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करीत नाही. त्यामुळे मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचेही या कुटुंबांमध्ये स्वागत केले जाते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक राहत आला आहे.एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील दर हजार मुलांमागे मुलींचा सरासरी जन्मदर ९५२ एवढा आहे. चामोर्शी तालुक्यातील मुलींचा जन्मदर दरहजार मुलांमागे १०४० तर सिरोंचा तालुक्यातील मुलींचा जन्मदर १०४५ एवढा आहे. उर्वरित अहेरी तालुक्यात हा जन्मदर ९८१, आरमोरी ९३०, धानोरा ७४९, एटापल्ली ९५८, गडचिरोली ९५९, कोरची ९५२, कुरखेडा ९८१, मुलचेरा ९७५, तर देसाईगंज तालुक्यात ८४६ एवढा आहे. आधुनिकीकरणामुळे नष्ट होत चाललेले जंगल आणि कमी होत असलेली मुलींची संख्या, या दोन्ही गोष्टी गडचिरोली जिल्ह्यात जोपासल्या जात आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य