शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

जनआरोग्य योजना ग्रामीणांसाठी मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:57 IST

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना फोल ठरत आहे.

ठळक मुद्देगाठावे लागते जिल्हास्थळ : केवळ एकच रुग्णालय संलग्नित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना फोल ठरत आहे.गरीब व्यक्तींवर खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व्हाव्या, या उद्देशाने १ जुलै २०१२ रोजी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली. १ एप्रिल २०१७ रोजी या योजनेचे नाव बदलवून ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ असे ठेवण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी राशनकार्डधारकांना सुमारे दीड लाख रूपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला जातो.शासनाने राज्यातील नागरिकांचा विमा काढला असून शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपनीवर सोपविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही योजना १ जुलै २०१२ पासून सुरू झाली आहे. विमा कंपनीसोबत संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात. विमा कंपनीसोबत रुग्णालय संलग्न होण्यासाठी संबंधित रुग्णालयाची बेड क्षमता ३० पेक्षा अधिक असावी, २४ तास एमबीबीएस डॉक्टर व सर्जन उपलब्ध असावे, आयसीयूची व्यवस्था असावी, अशा अटी आहेत. आरमोरी, अहेरी व कुरखेडा येथील रुग्णालये तसेच नव्यानेच झालेले महिला व बाल रुग्णालय या अटी व शर्तींमध्ये बसू शकतात. ही रुग्णालये संलग्न झाल्यास त्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास मदत होईल. जनआरोग्य योजनेतून प्राप्त झालेल्या पैशातून रुग्णालयात पुन्हा चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. मात्र गडचिरोली येथील केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयच कंपनीसोबत संलग्न आहे. त्यामुळे याच रुग्णालयात रुग्णांवर उपचार होतात. परिणामी जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली येथे यावे लागते किंवा मोठी शस्त्रक्रिया असल्यास वर्धा किंवा नागपूर गाठावे लागते. अहेरी, आरमोरी व कुरखेडा रुग्णालयात जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार झाल्यास नागरिकांचा ये-जा करण्याचा त्रास वाचण्यास मदत होईल.६ हजार ४६८ रुग्णांवर शस्त्रक्रियायोजनेच्या सुरुवातीपासून गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार ४६८ रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यावर १४ कोटी ८५ लाख २९५ रूपये खर्च झाले आहेत. यातील २ हजार ३४४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी रुग्णालयाला २ कोटी ६२ लाख ९३ हजार रूपये देण्यात आले आहेत. इतर उपजिल्हा रुग्णालय या योजनेसोबत संलग्न झाल्यास त्यांना शस्त्रक्रियेचे पैसे मिळतील. यातून रुग्णालयात सोयीसुविधा उभारणे शक्य होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.आरोग्यमित्रांची संख्या घटलीयोजनेला सुरुवात झाली त्यावेळी २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४५ पीएचसी, ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे ५७ आरोग्यमित्र कार्यरत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला सदर आरोग्यमित्र या योजनेविषयी माहिती देत होते. त्याचबरोबर त्याला रुग्णालयात भरती करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत होते. आता मात्र केवळ १६ आरोग्यमित्र कार्यरत आहेत. त्यातही एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, धानोरा येथे आरोग्यमित्र कार्यरत नाही. दुर्गम भागातील नागरिकांना या योजनेविषयी माहिती राहत नाही. त्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांचे समूपदेशन करण्यासाठी आरोग्यमित्रांची पदे भरणे आवश्यक आहे.आरमोरी, कुरखेडा व अहेरी उपजिल्हा रुग्णालये विमा कंपनीसोबत संलग्न करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. रुग्णालय संलग्न करण्याच्या बाबी वरिष्ठस्तरावरून केल्या जातात. नव्यानचे झालेले महिला व बाल रुग्णालयसुद्धा संलग्न करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल.- डॉ.अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली

टॅग्स :Healthआरोग्य