शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; तरीही भीती झुगारून लेकीची ‘आपल्या’ लोकांना साथ

By मनोज ताजने | Updated: January 31, 2023 12:26 IST

गडचिरोलीच्या दुर्गम भागात देताहेत डॉक्टर दाम्पत्य सेवा

गडचिरोली : बारावीला असताना तिच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी अमानुषपणे हत्या केली. त्या कटू आठवणींपासून दूर जाऊन तिलाही भौतिक सुविधा उपभोगत सुखी जीवन जगता आले असते. पण ते नाकारत एका लेकीने बालपणापासून ज्या वातावरणात राहिले, तेथील लोकांचे दु:ख, वेदनांवर फुंकर घालण्यासाठी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयाेग करण्याचे ठरविले. नक्षलवाद्यांची भीती झुगारून तिच्या या संकल्पाला पतीनेही तेवढ्याच समर्थपणे साथ दिली. आज हे डॉक्टर दाम्पत्य त्या भागातील गोरगरीब आदिवासींसाठी मोठा आधार बनले आहे.

ही कहाणी आहे भामरागड तालुक्यातील लाहेरी या छोट्या गावात बालपण गेलेल्या डॉ. भारती बोगामी आणि डॉ. सतीश तिरणकर या डॉक्टर दाम्पत्याची. गेल्या ५ वर्षांपासून हे दाम्पत्य स्वखुशीने गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. या अनोखा संकल्प आणि सेवाभावाबद्दल ‘लोकमत’ने डॉ. भारती यांना बोलते केले असताना त्यांनी आपली कहाणी सांगितली.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती असलेले त्यांचे वडील मालू कोपा बोगामी यांची २००२ मध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली. पुढे आईला पॅरालिसिसचा झटका आला. पुण्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाला असताना भारती यांना बोन ट्युमर (हाडांचा आजार) झाला. पण आर्थिक स्थिती व्यवस्थित नसताना सर्व संकटांवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा सुरू केली. आज त्यांचे पतीही त्यांच्या या संकल्पात त्यांना साथ देत आहेत.

बाबा आमटेंचे वाक्य कायम स्मरणात

डॉ. भारती या अहेरी येथे आपल्या आत्याकडे अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी होत्या. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यांच्या वडिलांच्या हत्येची धक्कादायक बातमी कळली. पण हे मोठे दु:ख पचवत वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याऐवजी परीक्षा देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यावेळी बाबा आमटे यांनी कौतुकाची थाप देत त्यांना म्हटले, ‘भूतकाळातून शिकायचे असते आणि भविष्याकडे चालायचे असते. बाळा, तू आज जो निर्णय घेतला असाच भविष्यातही घेत राहा’. त्यांचे हे वाक्य मला सतत प्रेरणा देत असतात, असे डॉ. भारती म्हणाल्या.

अरेंज मॅरेज, पण पतीचीही मिळाली साथ

डॉ. सतीश तिरणकर हे मुळचे बीड जिल्ह्यातील. गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणाऱ्या काही मराठवाड्यातील शिक्षकांनी ते स्थळ सुचविले. डॉ. सतीश पहायला आले आणि २०१७ मध्ये अवघ्या पाच दिवसात त्यांचा विवाहसुद्धा आटोपला. पण तत्पूर्वी डॉ. भारती यांनी त्यांच्याकडे खऱ्या गरजवंतांना सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. सतीश यांनी समर्थपणे साथ देत दिलेला शब्द पाळला आहे.

टॅग्स :Socialसामाजिकdoctorडॉक्टरGadchiroliगडचिरोलीsocial workerसमाजसेवक