शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नक्षलवाद्यांकडून वडिलांची हत्या; तरीही भीती झुगारून लेकीची ‘आपल्या’ लोकांना साथ

By मनोज ताजने | Updated: January 31, 2023 12:26 IST

गडचिरोलीच्या दुर्गम भागात देताहेत डॉक्टर दाम्पत्य सेवा

गडचिरोली : बारावीला असताना तिच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी अमानुषपणे हत्या केली. त्या कटू आठवणींपासून दूर जाऊन तिलाही भौतिक सुविधा उपभोगत सुखी जीवन जगता आले असते. पण ते नाकारत एका लेकीने बालपणापासून ज्या वातावरणात राहिले, तेथील लोकांचे दु:ख, वेदनांवर फुंकर घालण्यासाठी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयाेग करण्याचे ठरविले. नक्षलवाद्यांची भीती झुगारून तिच्या या संकल्पाला पतीनेही तेवढ्याच समर्थपणे साथ दिली. आज हे डॉक्टर दाम्पत्य त्या भागातील गोरगरीब आदिवासींसाठी मोठा आधार बनले आहे.

ही कहाणी आहे भामरागड तालुक्यातील लाहेरी या छोट्या गावात बालपण गेलेल्या डॉ. भारती बोगामी आणि डॉ. सतीश तिरणकर या डॉक्टर दाम्पत्याची. गेल्या ५ वर्षांपासून हे दाम्पत्य स्वखुशीने गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. या अनोखा संकल्प आणि सेवाभावाबद्दल ‘लोकमत’ने डॉ. भारती यांना बोलते केले असताना त्यांनी आपली कहाणी सांगितली.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती असलेले त्यांचे वडील मालू कोपा बोगामी यांची २००२ मध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली. पुढे आईला पॅरालिसिसचा झटका आला. पुण्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाला असताना भारती यांना बोन ट्युमर (हाडांचा आजार) झाला. पण आर्थिक स्थिती व्यवस्थित नसताना सर्व संकटांवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा सुरू केली. आज त्यांचे पतीही त्यांच्या या संकल्पात त्यांना साथ देत आहेत.

बाबा आमटेंचे वाक्य कायम स्मरणात

डॉ. भारती या अहेरी येथे आपल्या आत्याकडे अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी होत्या. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यांच्या वडिलांच्या हत्येची धक्कादायक बातमी कळली. पण हे मोठे दु:ख पचवत वडिलांचे अंत्यदर्शन घेण्याऐवजी परीक्षा देण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यावेळी बाबा आमटे यांनी कौतुकाची थाप देत त्यांना म्हटले, ‘भूतकाळातून शिकायचे असते आणि भविष्याकडे चालायचे असते. बाळा, तू आज जो निर्णय घेतला असाच भविष्यातही घेत राहा’. त्यांचे हे वाक्य मला सतत प्रेरणा देत असतात, असे डॉ. भारती म्हणाल्या.

अरेंज मॅरेज, पण पतीचीही मिळाली साथ

डॉ. सतीश तिरणकर हे मुळचे बीड जिल्ह्यातील. गडचिरोली जिल्ह्यात सेवा देणाऱ्या काही मराठवाड्यातील शिक्षकांनी ते स्थळ सुचविले. डॉ. सतीश पहायला आले आणि २०१७ मध्ये अवघ्या पाच दिवसात त्यांचा विवाहसुद्धा आटोपला. पण तत्पूर्वी डॉ. भारती यांनी त्यांच्याकडे खऱ्या गरजवंतांना सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. सतीश यांनी समर्थपणे साथ देत दिलेला शब्द पाळला आहे.

टॅग्स :Socialसामाजिकdoctorडॉक्टरGadchiroliगडचिरोलीsocial workerसमाजसेवक