शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भामरागड-कोरचीही राष्ट्रीय महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 23:47 IST

जिल्ह्यातील खराब रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. दुर्गम भागातीलच नाही तर काही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गांचीही दुरवस्था झाली आहे. पण काही महिन्यातच या खड्डेमय रस्त्यांचे रूप पालटणार आहे.

ठळक मुद्देडीपीआर बनविणे सुरू : वनकायद्याच्या अडचणींमुळे कामांना होत आहे विलंब ५५

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील खराब रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. दुर्गम भागातीलच नाही तर काही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गांचीही दुरवस्था झाली आहे. पण काही महिन्यातच या खड्डेमय रस्त्यांचे रूप पालटणार आहे. काही नवीन तालुका मुख्यालय राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्याने त्या रस्त्यांची दुरवस्था दूर होऊन हे मार्ग चौपदरी आणि गुळगुळीत होणार आहेत.आलापल्ली ते भामरागड हा ६२.७० किलोमीटरचा मार्ग तसेच ब्रह्मपुरी-वडसा-कुरखेडा-कोरची हा ७६ किलोमीटरचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला आहे. या दोन्ही मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. आष्टी ते सिरोंचा आणि गडचिरोली ते मुरूमगाव (छत्तीसगड सीमा) या राष्ट्रीय महामार्गासाठीही डीपीआरचे काम सुरू आहे. तो अहवाल तयार झाल्यानंतर शासनाला सादर केला जाईल. शासनाकडून त्या कामाला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू होईल. आरमोरी ते गडचिरोली या मार्गाचा डीपीआर आधीच राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या तत्कालीन नागपूर विभागाने शासनाकडे सादर केला आहे. पण अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.जिल्ह्यातून जाणाºया दोन राष्ट्रीय महामार्गांचे काम सध्या सुरू आहे. त्यात गडचिरोली ते मूल या ३३१ कोटी ६५ लाखांचे ४१.६२ किलोमीटर रस्त्याचे काम आणि बामणी (बल्लारशहा) ते आष्टी या १६३ कोटी ६१ लाख रुपयांचे ४२.२५ किलोमीटरचे काम सुरू झाले आहे. या मार्गातील जंगलाचे क्षेत्र असणाऱ्या भागातील कामाच्या परवानगीसाठी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र वनकायद्याच्या अडचणी दाखवत अद्याप त्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आलेला नाही.ज्या महामार्गांचे काम प्रस्तावित आहे त्या भागात नक्षल समस्या अधिक तीव्र आहे. गडचिरोली-आष्टी मार्गाप्रमाणेच त्या मार्गांसाठीही कंत्राटदार मिळण्यास अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकराच लवकर डीपीआरचे काम पूर्ण करून निविदा प्रक्रिया करावी अशी अपेक्षा केली जात आहे. मूल ते चंद्रपूर, उमरेड ते चिमूर आणि चिमूर ते वरोरा या मार्गांचेही काम जोरात सुरू आहे. हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद यासारख्या महानगरातील कंत्राटदार कंपन्यांकडून हे काम केले जात आहे.भूसंपादनासाठी निधी तयारजिल्ह्यात ज्या राष्ट्रीय महामार्गांचे काम प्रस्तावित आहे त्या मार्गासाठी लागणाऱ्या रस्त्यालगतच्या अतिरिक्त जमिनीच्या संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली आहे. महामार्ग प्राधिकरणाने त्यासाठी लागणारा निधीही एसडीओ आणि महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया वेग घेणार आहे.गडचिरोली-आष्टी मार्गासाठी कंत्राटदार मिळेनागडचिरोली ते आष्टी या ६८.७० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ३९६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या कामासाठी २ वेळा निविदा प्रक्रियाही झाली. परंतू कंत्राटदाराअभावी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता तिसऱ्यांदा या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून हा मार्ग सर्वाधिक खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गाचे काम कधी सुरू होते याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.जंगलाच्या भागात राहणार डांबरीच रस्ताराष्ट्रीय महामार्गाच्या निकषानुसार हा रस्ता ३० मीटर रूंदीचा असणे गरजेचे आहे. परंतु जंगलाच्या क्षेत्रात तो २४ मीटर रूंदीचा ठेवण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तयारी आहे. याशिवाय जंगलाच्या भागात सिमेंटऐवजी डांबरीच रस्ता ठेवण्यासही तयार आहे. मात्र वनविभाग जंगलाच्या भागातील केवळ ३.५ मीटर रूंदीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याचे सांगत अतिरिक्त जागा देण्यास तयार नाही. वास्तविक सद्यस्थितीत राज्य महामार्ग जंगली भागातही २४ मीटर रूंदीचे आहेत. अतिरिक्त जागा अजूनही वनविभागाच्या मालकीची आहे. यावर दिल्ली दरबारी लवकर तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे.दुर्गम भागातील समस्या कायमराष्ट्रीय महामार्गाशी जोडलेले तालुका मुख्यालय आणि त्या मार्गातील गावांची रस्त्याची समस्या या नवीन महामार्गामुळे दूर होणार आहे. परंतु दुर्गम भागातील रस्ते आणि पुलांची अवस्था मात्र अजूनही वाईट आहे. त्यांच्या समस्यांकडेही लक्ष द्यावे आणि बारमाही रहदारी सुरू राहतील असे मार्ग तयार करावे अशी त्या भागातील नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गGadchiroliगडचिरोली