शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत.

ठळक मुद्देदेवलमरी मार्गावर लावले फलक : दोन कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेलया देवलमरी-कोतागुडम रस्त्यावर मागील काही दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यासाठी या मार्गावर वनविभागाने ठिकठिकाणी फलक लावले आहेत.आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी घराबाहेर पडावेच लागते. अशातच वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरीवर्गामध्ये दहशत निर्माण झाली आहे. देवलमरी, रंकलगुंडी व कोत्तागुडम या तीन ठिकाणी धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीनच फुलते. हे निसर्ग सौंदर्य पाहण्याबरोबरच आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी अनेक युवक या धबधब्यांवर जातात. हे तीनही धबधबे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकºयांनी वाघाच्या वास्तव्याची माहिती वनविभागाला दिली. तसेच लोकमतनेही २९ जुलै रोजी वाघाच्या छायाचित्रासह बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्लीतर्फे या परिसरात वाघ असल्याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी दोन वनकर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही थोडे सावध झाले आहेत.रोवणीच्या कामांवर परिणामदेवलमरी परिसरात धान रोवणीची कामे सुरू आहेत. शेतकरी सकाळीच जाऊन रात्री उशिरापर्यंत परत येत होते. मात्र वाघामुळे शेतातून लवकरच घरी परत यावे लागत आहे. तसेच सकाळी ८ ते ९ वाजताशिवाय शेतकरी शेतात पोहोचत नाही. याचा परिणाम धानाच्या रोवण्यांवर झाला आहे. रोवणी झाल्यानंतरही शेतीकडे शेतकऱ्यांना जावेच लागणार आहे. यापूर्वीही वाघाने गावातील जनावरांना फस्त केले आहे. त्यामुळे वाघाकडून मानवावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. वनविभागाने या भागात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. तसेच नागरिकांमध्ये वाघाच्या वास्तव्याविषयी जागृती केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग