शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत.

ठळक मुद्देदेवलमरी मार्गावर लावले फलक : दोन कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेलया देवलमरी-कोतागुडम रस्त्यावर मागील काही दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यासाठी या मार्गावर वनविभागाने ठिकठिकाणी फलक लावले आहेत.आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी घराबाहेर पडावेच लागते. अशातच वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरीवर्गामध्ये दहशत निर्माण झाली आहे. देवलमरी, रंकलगुंडी व कोत्तागुडम या तीन ठिकाणी धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीनच फुलते. हे निसर्ग सौंदर्य पाहण्याबरोबरच आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी अनेक युवक या धबधब्यांवर जातात. हे तीनही धबधबे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकºयांनी वाघाच्या वास्तव्याची माहिती वनविभागाला दिली. तसेच लोकमतनेही २९ जुलै रोजी वाघाच्या छायाचित्रासह बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्लीतर्फे या परिसरात वाघ असल्याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी दोन वनकर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही थोडे सावध झाले आहेत.रोवणीच्या कामांवर परिणामदेवलमरी परिसरात धान रोवणीची कामे सुरू आहेत. शेतकरी सकाळीच जाऊन रात्री उशिरापर्यंत परत येत होते. मात्र वाघामुळे शेतातून लवकरच घरी परत यावे लागत आहे. तसेच सकाळी ८ ते ९ वाजताशिवाय शेतकरी शेतात पोहोचत नाही. याचा परिणाम धानाच्या रोवण्यांवर झाला आहे. रोवणी झाल्यानंतरही शेतीकडे शेतकऱ्यांना जावेच लागणार आहे. यापूर्वीही वाघाने गावातील जनावरांना फस्त केले आहे. त्यामुळे वाघाकडून मानवावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. वनविभागाने या भागात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. तसेच नागरिकांमध्ये वाघाच्या वास्तव्याविषयी जागृती केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग