शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, वाघाचे वास्तव्य आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत.

ठळक मुद्देदेवलमरी मार्गावर लावले फलक : दोन कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेलया देवलमरी-कोतागुडम रस्त्यावर मागील काही दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यासाठी या मार्गावर वनविभागाने ठिकठिकाणी फलक लावले आहेत.आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवलमरी परिसरात रोवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी घराबाहेर पडावेच लागते. अशातच वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरीवर्गामध्ये दहशत निर्माण झाली आहे. देवलमरी, रंकलगुंडी व कोत्तागुडम या तीन ठिकाणी धबधबे आहेत. पावसाळ्यात या धबधब्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याने येथील निसर्ग सौंदर्य आणखीनच फुलते. हे निसर्ग सौंदर्य पाहण्याबरोबरच आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी अनेक युवक या धबधब्यांवर जातात. हे तीनही धबधबे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावकºयांनी वाघाच्या वास्तव्याची माहिती वनविभागाला दिली. तसेच लोकमतनेही २९ जुलै रोजी वाघाच्या छायाचित्रासह बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय रेपनपल्लीतर्फे या परिसरात वाघ असल्याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी दोन वनकर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही थोडे सावध झाले आहेत.रोवणीच्या कामांवर परिणामदेवलमरी परिसरात धान रोवणीची कामे सुरू आहेत. शेतकरी सकाळीच जाऊन रात्री उशिरापर्यंत परत येत होते. मात्र वाघामुळे शेतातून लवकरच घरी परत यावे लागत आहे. तसेच सकाळी ८ ते ९ वाजताशिवाय शेतकरी शेतात पोहोचत नाही. याचा परिणाम धानाच्या रोवण्यांवर झाला आहे. रोवणी झाल्यानंतरही शेतीकडे शेतकऱ्यांना जावेच लागणार आहे. यापूर्वीही वाघाने गावातील जनावरांना फस्त केले आहे. त्यामुळे वाघाकडून मानवावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. वनविभागाने या भागात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. तसेच नागरिकांमध्ये वाघाच्या वास्तव्याविषयी जागृती केली जात आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग