शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

मृतकाच्या वारसदारांना मिळाले दोन लाख रूपये

By admin | Updated: August 13, 2015 00:28 IST

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शी येथील खातेदार शालिनी गजानन दुधबावरे यांनी केवळ १२ भरून स्वत:चा विमा काढला होता.

चामोर्शी : प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शी येथील खातेदार शालिनी गजानन दुधबावरे यांनी केवळ १२ भरून स्वत:चा विमा काढला होता. दुर्दैवाने शालिनी दुधबावरे हिचा स्वयंपाक करताना जळाल्याने मृत्यू झाला. ग्रामीण बँकेने विमा कंपनीकडे संबंधित खातेदाराच्या वारसदारांना विम्याच्या रकमेचा लाभ देण्यात यावा, असा दावा सादर केला. विमा कंपनीने सदर दावा मंजूर केल्यानंतर मृतकाचे वारसदार गजानन उष्टू दुधबावरे याला दोन लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.भाजप प्रणीत केंद्र सरकारद्वारे घोषित सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेद्वारे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शी येथील शालिनी गजानन दुधबावरे यांनी जीवन सुरक्षा विमा योजनेचे खाते उघडले.खातेदार शालिनी गजानन दुधबावरे ही घरी स्वयंपाक करताना जळून तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चामोर्शीचे शाखाधिकारी हबीब सय्यद यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गजानन दुधबावरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. त्यानुसार दुधबावरे कुटुंबीयांनी सर्व आवश्यक कागदपत्रे ४ जुलै २०१५ रोजी शाखा व्यवस्थापकाकडे सादर केले. सदर कागदपत्र जोडून शाखा व्यवस्थापक दि न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीकडे दावा सादर केला. कंपनीने दावा मंजूर केल्यानंतर विम्याचे दोन लाख रूपये ग्रामीण बँकेकडे जमा झाले. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक हबीब सय्यद यांनी ७ जुलै रोजी शुक्रवारला कुरूड येथील बँकेच्या अति लघु शाखेत मृतकाचे वारसदार गजानन दुधबावरे यांना प्रदान केला. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी एस. जी. खत्री, दिलीप काशिनाथ चलाख, कुरूडचे उपसरपंच रमेश सातपुते, ग्रा. पं. सदस्य बाबुराव शेंडे, ग्रामसेवक प्रधान आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.विदर्भ कोकण ग्रामीण बँकेद्वारे भारत सरकारच्या विमा योजनेची माहिती गावागावात जाऊन दिली जात आहे. सदर घटनेमुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची सामाजिक बांधिलकी जनतेसमोर आली आहे. याअनुभवातून योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले भविष्य सुरक्षित करावे, तसेच आयुष्य सुरक्षित करणाऱ्या व म्हातारपणाची सोय म्हणून नागरिकांनी अटल पेंशन योजनेचाही लाभ घ्यावा. यासाठी ग्रामीण बँकेच्या कोणत्याही शाखेशी नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीधर नार्लावार यांनी यावेळी केले. (शहर प्रतिनिधी)विरोधी पक्षांच्या नेत्यांना बसली चपराककेंद्रात भाजप-शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर प्रधानमंत्री पदाची सूत्रे नरेंद्र मोदी यांनी स्वीकारली. त्यांनी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षातील नेते पंतप्रधानांच्या साऱ्याच योजना सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका केली होती. मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत खातेदाराच्या वारसदारास लाभ मिळाल्यामुळे टीका करणाऱ्या या नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.