शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

समन्वयातून आपत्तीवर मात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:42 IST

जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते.

ठळक मुद्देशांतनू गोयल यांच्या सूचना : गडचिरोलीत मान्सूनपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते. यामध्ये गावाकडे जाण्याच्या घाईत पुलावरुन पाणी असतांनाही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात व मृत्यू ओढवून घेतात. या सर्व बाबींना निर्बंध करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी यंत्रणा कार्यरत आहे. तेव्हा नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेत काम करणाºयांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांनी केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी नियोजन विभागाच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके, उपस्थित होते. बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील उद्भवणाºया धोक्यांसंदर्भात माहिती सांगितली. यामध्ये अतिवृष्टी, वज्राघात, पूर, बोट अपघात, साथरोग, औषधांचा तुटवडा, धोकादायक तलावे, इमारती, कार्यालये, कमी उंचीच्या पुलामुळे वाहतूक खंडीत होणे, गोसेखुर्द, इटियाडोह, वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर यातुन सोडणारे पाणी/ विसर्ग, विद्युत पुरवठा खंडित होणे, दुरध्वनी, मोबाईल व इंटरनेट सुविधा विस्कळीत होत असते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रशिक्षीत पथके गाव, तालुका, जिल्हा पातळीवर तयार करण्यात आले आहेत. ही पथके आपले कर्तव्य एक सामाजिक दायीत्व असल्याची भावना ठेवून केल्यास होणाºया संभाव्य नुकसानीची तीव्रता कमी करता येईल. या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व नं. प. चे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यातील आपत्ती निवारणावरील उपाययोजनांवर चर्चा झाली.