शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून आपत्तीवर मात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:42 IST

जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते.

ठळक मुद्देशांतनू गोयल यांच्या सूचना : गडचिरोलीत मान्सूनपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते. यामध्ये गावाकडे जाण्याच्या घाईत पुलावरुन पाणी असतांनाही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात व मृत्यू ओढवून घेतात. या सर्व बाबींना निर्बंध करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी यंत्रणा कार्यरत आहे. तेव्हा नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेत काम करणाºयांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांनी केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी नियोजन विभागाच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके, उपस्थित होते. बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील उद्भवणाºया धोक्यांसंदर्भात माहिती सांगितली. यामध्ये अतिवृष्टी, वज्राघात, पूर, बोट अपघात, साथरोग, औषधांचा तुटवडा, धोकादायक तलावे, इमारती, कार्यालये, कमी उंचीच्या पुलामुळे वाहतूक खंडीत होणे, गोसेखुर्द, इटियाडोह, वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर यातुन सोडणारे पाणी/ विसर्ग, विद्युत पुरवठा खंडित होणे, दुरध्वनी, मोबाईल व इंटरनेट सुविधा विस्कळीत होत असते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रशिक्षीत पथके गाव, तालुका, जिल्हा पातळीवर तयार करण्यात आले आहेत. ही पथके आपले कर्तव्य एक सामाजिक दायीत्व असल्याची भावना ठेवून केल्यास होणाºया संभाव्य नुकसानीची तीव्रता कमी करता येईल. या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद व नं. प. चे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी पावसाळ्यातील आपत्ती निवारणावरील उपाययोजनांवर चर्चा झाली.