शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

येर्रावागू तलावावरील बंधारा तुटलेलाच

By admin | Updated: November 16, 2015 01:25 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्लीनजीकच्या लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या येर्रावागू तलावावर ...

४० वर्षे उलटली : आसरअल्ली भागात सिंचन व्यवस्थेचा बोजवाराआसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्लीनजीकच्या लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या येर्रावागू तलावावर १९६० मध्ये सिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला. त्यावेळी या भागातील शेकडो एकर शेतजमीनीला सिंचन सुविधा निर्माण झाले. मात्र येर्रावागू तलावाचा बंधारा तुटल्यामुळे सिंचन सुविधेचा पूर्णत: बोजवारा वाजला आहे. गेल्या ४० वर्षांपासून बंधारा तुटलेल्या अवस्थेत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी येर्रावागू नाला खूप लहान होता. त्यामुळे पुलाच्या ऐवजी या नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा रपटा तयार करण्यात आला. मात्र ४० वर्षांपूर्वी येर्रावागू तलावाचा बंधारा तुटल्यामुळे येर्रावागू नाल्यामुळे आता नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आता येर्रावागू नाल्यावर १७ कोटी रूपयांच्या खर्चातून मोठा पूल मंजूर करण्यात आला असून त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. येर्रावागू तलावावरील जुना बंधारा तुटल्यामुळे याचा आसरअल्ली भागातील आसरअल्ली भागातील ४५ ते ५० गावातील शेतजमिनीला फटका बसला. लक्ष्मीदेवपेठा येथील सरपंच व्यंकटेश्वरलू शानगोंडा यांनी तुटलेल्या बंधाऱ्याला भेट देऊन तलावाची पाहणी केली. या ठिकाणी नव्याने बंधारा बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोनदा या भागात येऊन येर्रावागू तलाव व बंधाऱ्याची पाहणी केली. मात्र त्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाचे आसरअल्ली भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)