शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बोअरवेल कंपनीला केला दंड

By admin | Updated: September 25, 2015 01:56 IST

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेत जमिनीला सिंचीत करण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील जय महाकाली बोअरवेल अँड मशिनरी या कंपनीकडून बोअर मारून घेतले होते.

जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल : भेंडाळाच्या शेतकऱ्याला ३३ हजार रूपये देण्याचे आदेशगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेत जमिनीला सिंचीत करण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील जय महाकाली बोअरवेल अँड मशिनरी या कंपनीकडून बोअर मारून घेतले होते. मात्र बोअर मारल्यानंतर आपली फसवणूक झाली. ही बाब संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी बोअरवेल मारून देणाऱ्या कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली. त्यांनी देण्यास टाळाटाळ केल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात त्यांनी धाव घेतली. ग्राहक मंचाने शेतकऱ्यास ३३ हजार रूपये देण्याचा निर्णय बुधवारी दिला आहे. भेंडाळा येथील मनोहर पत्रूजी तुंबडे यांची मौजा भेंडाळा येथे सर्वे नंबर ३२५ आराजी १.९० हेक्टर ही शेतजमीन अजल सिंचित आहे. त्यामुळे मनोहर तुंबडे यांनी १५ जून २०१४ ला मुलचेरा तालुक्यातील जय महाकाली बोअरवेल अँड मशिनरीचे प्रोप्रायटर सुकुमार उर्फ सुखदेव मंडल यांच्याकडून बोअरवेल मारून घेतले. त्यापूर्वी मंडलसोबत ९ इंची बोअरवेल ३०० फूट खोल व २०० फूट केसींग टाकण्याबाबत ठरले होते. परंतु मंडल यांनी ठरल्याप्रमाणे नऊ इंचीचा बोअरवेल मारला नाही. तो साडेसहा इंचीचा मारला व ६० फूटपर्यंतच पीव्हीसी केसींग टाकले. याबाबीला तुंबडे यांनी आक्षेप घेतला. तेव्हा मंडल यांच्या आॅपरेटरने मालकांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण काम केले, असे सांगितले. त्यामुळे तुंबडे यांना नाईलाजास्तव काम न होताही पूर्ण रक्कम द्यावी लागली. परंतु बोअरवेलमधून पाणी उपसा केल्यावर लागलीच गढूळ पाणी येत होते. वारंवार मोटार बंद पडत होती. त्यामुळे त्यांच्या १२० पोते धान पिकाचे नुकसानही झाले. नवीन बोअरवेल मारून द्यावी, अशी मागणी मंडल यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तुंबडे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय चंद्रलाल प्रेमचंदानी यांनी २३ सप्टेंबर रोजी या प्रकरणी निकाल देताना मनोहर तुंबडे यांना बोअरवेलची संपूर्ण रक्कम २५ हजार ५००, शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये व तक्रारीचा खर्च २ हजार ५०० रूपये द्यावा, असा आदेश जारी केला. तुंबडे यांच्या वतीने अ‍ॅड. आर. बी. म्हशाखेत्री व अ‍ॅड. के. आर. म्हशाखेत्री यांनी काम पाहिले. ग्राहक मंचाच्या या निकालामुळे आपल्याला योग्य न्याय मिळाला असून गडचिरोली जिल्ह्यातील जे शेतकरी शेतात बोअरवेल खोदतात त्यांनी संबंधित कंपनीकडून रितसर बिल घ्यावे, असे आवाहन मनोहर तुंबडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)