गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात एक नवा इतिहास घडला आहे, जेव्हा देसाईगंज येथील आयेशा शेखानी नावाची एक तरुणी या भागातील पहिली मुस्लिम महिला वकील म्हणून समोर आली. ही यशस्वीता केवळ आयेशासाठीच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली आणि मुस्लिम समाजासाठी अभिमानाची बाब आहे. हा भाग, जो नक्षलग्रस्त असल्यामुळे आपल्या आव्हानांसाठी ओळखला जातो, आता आयेशाच्या या यशासह एक सकारात्मक बदलाची कहानी लिहीत आहे. तिची ही कामगिरी सामाजिक अडथळे तोडण्याच्या आणि महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आयेशाने नागपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण (एलएलबी) सुरु केले हे तिच्यामाठी सोपे नव्हते, कारण गडचिरोलीपासून नागपूरचे अंतर आणि तिथल्या शिक्षणाचा खर्च भागवणे तिच्या कुटुंबासाठी आव्हानात्मक होते. पण आयेशाने आपल्या अभ्यासादरम्यान केवळ चांगले गुणच मिळवले नाहीत, तर कायद्याच्या क्षेत्रात आपली खोल रुचीही विकसित केली.
एलएलबीची पदवी मिळवल्यानंतर, आयेशाने महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली आणि गडचिरोली जिल्हा न्यायालयात वकिली सुरु केली. तिच्या या पावलाने स्थानिक समाजात खळबळ माजवली, कारण पहिल्यांदाच एक मुस्लिम महिला या भागात वकिलीच्या व्यवसायात उत्तरली होती. गडचिरोलीत महिलांची सहभागिता, विशेषतः मुस्लिम समाजातील महिलांची, व्यावसायिक क्षेत्रात अत्यंत कमी होती. अशा परिस्थितीत आयेशाचा हा निर्णय केवळ धाडसीच नव्हता, तर प्रेरणादायीही होता.
जेव्हा आयेशाने पहिल्यांदा गडचिरोलीच्या न्यायालयात पाऊल ठेपले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांसाठी हे एक अनोखे दृश्य होते. तिच्या पहिल्या खटल्यात तिने एका गरीब कुटुंबाला मदत केली, ज्यांच्याकडे कायदेशीर मदतीसाठी संसाधने नव्हती. तिची तयारी, आत्मविश्वास आणि कायद्याप्रती समर्पणनाने न्यायालयात उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खटल्याने तिची प्रतिष्ठा मजबूत केलीच, शिवाय हा संदेशही दिला की, ती समाजातील दुर्बल घटकांचे हक्क लढण्यास तयार आहे.
आयेशाचा हा प्रवास आव्हानांशिवाय नव्हता. गडचिरोलीसारख्या भागात, जिथे रूढीवादी विचार आणि पितृसत्ताक व्यवस्था खोलवर रुजलेली आहे, तिथे एक मुस्लिम महिला वकील बनणे सोपे नव्हते. तिला केवळ सामाजिक दबावांचाच सामना करावा लागला नाही, तर तिच्या समाजातील काही लोकांच्या टीकेचाही सामना करावा लागला, काहींनी तिच्या या निर्णयाला 'अयोग्य ठरवले आणि म्हणाले की, महिलांनी अशा व्यवसायात जाऊ नये. पण आयेशाने या टीकांकडे दुर्लक्ष करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले.
तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आणि काही प्रगतीशील लोकांची मदत यामुळे तिला पुढे जाण्याची ताकद मिळाली. आयेशाचे मत आहे की, शिक्षण आणि स्वावलंबन हीच ती शस्त्रे आहेत, जी कोणत्याही महिलेला समाजात समान स्थान मिळवून देऊ शकतात. आयेशाची ही कामगिरी गडचिरोलीतील मुस्लिम समाज आणि महिलांसाठी एक मैलाचा दगड ठरली आहे. तिच्या यशाने केवळ स्थानिक मुलींनाच प्रेरणा दिली नाही, तर हेही दाखवून दिले की, योग्य संधी आणि मेहनतीने कोणीही आपली स्वप्ने पूर्ण करु शकते. गडचिरोलीत शिक्षण आणि जागरुकतेच्या अभावामुळे अनेक प्रतिभावान मुली आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत, पण आयेशाच्या कहाणीने त्यांना हा विश्वास दिला आहे की, त्या देखील काहीतरी मोठे करू शकतात, स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, आयेशाचे हे पाऊल येणाऱ्या पिठ्यांसाठी एक उदाहरण ठरेल. एका सामाजिक कार्यालयाने सांगितले, 'आयेशाने हे सिद्ध केले की, कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. तिची ही कामगिरी आमच्या समाजासाठी एक नवा प्रकाश आहे."
आयेशाचे स्वप्न केवळ वकील बनण्यापुरते मर्यादित नाही. तिला गडचिरोलीत कायदेशीर जागरुकता पसरवायची आहे आणि गरीबांना मोफत कायदेशीर मदत द्यायची आहे. ती म्हणते, "कायाद्याचा फायदा प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे जो आपल्या हक्कांपासून वंचित आहे. मला माझ्या भागातील लोकांना त्यांचे हक्क समजावेत आणि त्यासाठी लढता यावे असे वाटते. याशिवाय, तिला महिला आणि मुलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांवर विशेष लक्ष द्यायचे आहे, जी या भागात एक गंभीर समस्या आहे.
आयेशाची कहाणी ही अशा एका महिलेची कहाणी आहे. जिने केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या समाज आणि समुदायासाठी एक नवा मार्ग तयार केला. गडचिरोलीची पहिली मुस्लिम महिला वकील म्हणून तिचा हा प्रवास धैर्य, चिकाटी आणि बदलाची कहाणी आहे. आज रोजी, जेव्हा आपण तिच्या या कामगिरीकडे पाहतो, तेव्हा हे स्पष्ट आहे की, आयेशा केवळ एक वकील नाही, तर प्रेरणेचे प्रतीकही आहे. तिच्या यशाचा नाद केवळ गडचिरोलीतच नव्हे, तर संपूर्ण देशभरात ऐकू येईल आणि येणाऱ्या पिढ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल.
आयेशाची पार्श्वभूमी आणि सुरुवातीचे जीवनआयेशावा जन्म गडचिरोलीतील एका सामान्य मुस्लिम कुटुंबात झाला होता. या भागात शिक्षण आणि मडिलांसाठी व्यावसायिक संधींची कमतरता ही मोठी आव्हाने राहिली आहेत. आयेशाच्या कुटुंबाने तिच्या सिक्षणाला प्राधान्य दिले, परंतु सामाजिक आणि आर्थिक अडचणीमुळे तिच्या मार्गात अनेक अडथळे आले. तरीही, आयेशाने आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला. तिच्या आई आणि वडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि मेहनत आणि चिकाटीने कोणतेही ध्येय अशक्य नसते, असा विश्वास तिला दिला.