शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घाला

By admin | Updated: November 26, 2014 23:06 IST

विदर्भात तसेच गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे नियमाला डावलून ओव्हरलोड माल वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास सुरू आहे. परवानापेक्षा अधिक माल वाहनात भरून नेत असल्याने जिल्ह्यातील

गडचिरोली : विदर्भात तसेच गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे नियमाला डावलून ओव्हरलोड माल वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास सुरू आहे. परवानापेक्षा अधिक माल वाहनात भरून नेत असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे परिवहन व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विदर्भासह जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी रमेश गुंडरवार यांच्यासह अनेक नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात रमेश गुंडरवार यांनी म्हटले आहे की, मालवाहक ट्रकांना २५ टनाचा परवाना असला तरी वाहनात सरासरी ४० टन माल भरून वाहतूक केली जाते. १६ टनाचा परवाना असलेल्या वाहनातून ३० टन माल भरून वाहतूक केली जाते. ओव्हरलोड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहे. परिवहन विभाग व पोलीस प्रशासन नियमानुसार मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करीत असल्याचा आरोपही रमेश गुंडरवार यांनी केला आहे. रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एका रायॅल्टीवर दिवसभर ट्रीप वाहतूक केली जात आहे. अवैध रेती उत्खननामुळे घराचे बांधकाम करण्यासाठी घरमालकांना रेतीकरीता अधिकची किंमत द्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नव्या घराचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)