लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातून चामोर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम नियोजनानुसार होत नसल्याचे दिसून येते. संबंधित कंत्राटदारांनी वाहतुकीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणेने कंत्राटदाराला निर्देश देऊन नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसने केली आहे.चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित कंत्राटदारांनी करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. काम सुरू असलेल्या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आवागमनासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान नाल्यावरील पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे १६ जून रोजी मंगळवारला या ठिकाणी काही वाहन फसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दुसºयाने बाजूने रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीस योग्य करून देणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. सदर मार्गावर खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.भूमिगत गटार लाईनचे काम तत्काळ पूर्ण कराशहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची भूमिगत गटारलाईन टाकण्याची योजना हाती घेण्यात आली असून हे काम सुरू आहे. मात्र शहरात सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये गटारलाईन टाकल्यानंतरही त्या ठिकाणच्या रस्त्याची डागडुजी योग्यरित्या करण्यात आली नाही. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक लोक या रोडवर पडून त्यांना इजा होत आहे. येत्या आठ दिवसांत गटारलाईनचे काम योग्यरित्या पूर्ण करावे, अशी मागणी ब्राम्हणवाडे यांनी केली आहे. गटारलाईनसाठी खोदकाम केलेले रस्ते लवकरात लवकर बुजवावे, अशीही मागणी ब्राम्हणवाडेंसह शहरवासीयांनी केली आहे.
रस्ता कामात नागरिकांची गैरसोय टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST
चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित कंत्राटदारांनी करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ता कामात नागरिकांची गैरसोय टाळा
ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : जेसीबी लावून केली राष्ट्रीय महामार्गावर डागडुजी