शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामात नागरिकांची गैरसोय टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित कंत्राटदारांनी करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : जेसीबी लावून केली राष्ट्रीय महामार्गावर डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातून चामोर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम नियोजनानुसार होत नसल्याचे दिसून येते. संबंधित कंत्राटदारांनी वाहतुकीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणेने कंत्राटदाराला निर्देश देऊन नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसने केली आहे.चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित कंत्राटदारांनी करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. काम सुरू असलेल्या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आवागमनासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान नाल्यावरील पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे १६ जून रोजी मंगळवारला या ठिकाणी काही वाहन फसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दुसºयाने बाजूने रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीस योग्य करून देणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. सदर मार्गावर खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.भूमिगत गटार लाईनचे काम तत्काळ पूर्ण कराशहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची भूमिगत गटारलाईन टाकण्याची योजना हाती घेण्यात आली असून हे काम सुरू आहे. मात्र शहरात सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये गटारलाईन टाकल्यानंतरही त्या ठिकाणच्या रस्त्याची डागडुजी योग्यरित्या करण्यात आली नाही. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक लोक या रोडवर पडून त्यांना इजा होत आहे. येत्या आठ दिवसांत गटारलाईनचे काम योग्यरित्या पूर्ण करावे, अशी मागणी ब्राम्हणवाडे यांनी केली आहे. गटारलाईनसाठी खोदकाम केलेले रस्ते लवकरात लवकर बुजवावे, अशीही मागणी ब्राम्हणवाडेंसह शहरवासीयांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक