शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

रस्ता कामात नागरिकांची गैरसोय टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित कंत्राटदारांनी करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : जेसीबी लावून केली राष्ट्रीय महामार्गावर डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातून चामोर्शीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम नियोजनानुसार होत नसल्याचे दिसून येते. संबंधित कंत्राटदारांनी वाहतुकीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणेने कंत्राटदाराला निर्देश देऊन नागरिकांना होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसने केली आहे.चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित कंत्राटदारांनी करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. काम सुरू असलेल्या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आवागमनासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान नाल्यावरील पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे १६ जून रोजी मंगळवारला या ठिकाणी काही वाहन फसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दुसºयाने बाजूने रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीस योग्य करून देणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. सदर मार्गावर खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.भूमिगत गटार लाईनचे काम तत्काळ पूर्ण कराशहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची भूमिगत गटारलाईन टाकण्याची योजना हाती घेण्यात आली असून हे काम सुरू आहे. मात्र शहरात सुरू असलेल्या या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये गटारलाईन टाकल्यानंतरही त्या ठिकाणच्या रस्त्याची डागडुजी योग्यरित्या करण्यात आली नाही. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक लोक या रोडवर पडून त्यांना इजा होत आहे. येत्या आठ दिवसांत गटारलाईनचे काम योग्यरित्या पूर्ण करावे, अशी मागणी ब्राम्हणवाडे यांनी केली आहे. गटारलाईनसाठी खोदकाम केलेले रस्ते लवकरात लवकर बुजवावे, अशीही मागणी ब्राम्हणवाडेंसह शहरवासीयांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक