शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

कुरखेडा  शहरात एकूण सात कृषी केंद्र चालकांकडून खत विक्री केली जाते. त्या कृषी केंद्रात युरिया खत  नसल्याने शेतकरी बांधव निराश होऊन रिकाम्या हाताने आपल्या गावी जात आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांना एका कृषी केंद्र चालकाकडे युरिया खत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी त्या दुकानदाराकडे धाव घेतली; पण त्या ठिकाणी युरिया खताची चढ्या दराने विक्री होत असल्याचे प्रकरण दिसून आले.

सिराज पठाणलाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : धान पिकाच्या वाढीसाठी आता शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. याचा फायदा घेत काही व्यापारी युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने युरियाची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने कृषी दुकानदारांच्या स्टॉक आणि विक्रीची नियमित तपासणी करून गडबड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  येथील एका  कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध असूनही   शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी  तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. कुरखेडा  शहरात एकूण सात कृषी केंद्र चालकांकडून खत विक्री केली जाते. त्या कृषी केंद्रात युरिया खत  नसल्याने शेतकरी बांधव निराश होऊन रिकाम्या हाताने आपल्या गावी जात आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांना एका कृषी केंद्र चालकाकडे युरिया खत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी त्या दुकानदाराकडे धाव घेतली; पण त्या ठिकाणी युरिया खताची चढ्या दराने विक्री होत असल्याचे प्रकरण दिसून आले.शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जवाहर सोनकुसरे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन योग्य ती चौकशी करावी आणि कृषी केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शेतकरी देवानंद लोंहबरे, ईमरान कुरेशी, अंकुश कोकोडे, कमलेश दुर्वे, दुर्योधन साहरे, मोरेश्वर तुलावी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

युरिया संपल्याचे सांगत शेतकऱ्यांची बोळवण युरियाची चढ्या दराने विक्री सुरू असताना काही शेतकऱ्यांनी आम्हालाही युरिया पाहिजे, असे म्हटले. त्यावर आमच्याकडे आता फक्त ११ युरिया बॅग उपलब्ध आहेत व अगोदर आलेल्या ग्राहकांना मिळणार आहेत, असे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे तालुक्यातील काही युवा शेतकऱ्यांनी या संदर्भातील तक्रार कृषी अधिकारी गेडाम यांना देऊन घटनास्थळी नेले. तिथे जवळपास १०० युरियाच्या बॅग उपलब्ध असल्याचे दिसून आले. युरिया खत घेण्याकरिता गर्दी जमल्याने दुकानदार कृषी केंद्र बंद करून निघून गेला. दुकानदार शेतकऱ्यांशी खोटे बोलून प्रतिबॅग ३५० रुपये दराने विकत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शेतकरी तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले; पण त्या हजर नसल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी बोलून पंचायत समितीचे कृषी अधिकारी गेडाम यांच्याकडे तक्रार देण्यास सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी