शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

नवीन सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 8:29 PM

Gadchiroli News सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देकेजरीवालांच्या वक्तव्याचा निषेध

गडचिराेली : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत तसेच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा एनसीआरबीचा रिपाेर्ट आहे. या दाेन्ही सरकारच्या काळात महिला असुरक्षित झाल्या, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला.

घाेट परिसरातील काेठरी बुद्धविहारात वर्षावास समापन साेहळ्याच्या निमित्ताने प्रा. कवाडे गुरुवारी गडचिराेलीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. सर्वधर्म समभावाचे तत्त्व पाळणाऱ्या महाराष्ट्रात, तसेच देशात सध्या केवळ सत्तेसाठी राजकारण केल्या जात आहे, असा आराेप प्रा. कवाडे यांनी केला.

आगामी काळात आमचा पीरिपा पक्ष काेणत्या पक्षासाेबत आघाडी करणार, काेणत्या पक्षासाेबत जायचे, याबाबतचा निर्णय ११ नाेव्हेंबरपर्यंत पक्षाची काेअर कमिटी घेणार आहे, असे प्रा. कवाडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीश्वर बाेरकर, महासचिव भूषण सहारे, प्रमाेद खाेब्रागडे, दिलीप पाटील, ॲड. विनाेद बांबाेळे आदी उपस्थित हाेते.

संविधान हाच धर्म

भारतीय चलनी नाेटांवर महात्मा गांधीजींचा फाेटाे आहे. त्या नाेटांवर माता लक्ष्मी व गणेशजी यांचे फाेटाे प्रकाशित करावे, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले. या वक्तव्याने सर्वधर्म समभावाच्या तत्त्वाला मूठमाती दिल्यासारखे हाेईल. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. सरकार व देशाला काेणताही धर्म नाही. देश आणि सरकारसाठी संविधान हाच धर्म आहे, असे सांगत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या वक्तव्याचा आपण निषेध करताे, असे प्रा. कवाडे यावेळी म्हणाले.

सुरजागड प्रकल्प गडचिराेली जिल्ह्यातच व्हावा

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प गडचिराेली जिल्ह्यातच झाला पाहिजे, जेणेकरून स्थानिक बेराेजगारांना राेजगार मिळेल, अशी भूमिका प्रा. कवाडे यांनी यावेळी मांडली. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन उद्याेग उभारणीसाठी आपण पाठपुरावा करणार, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडे