शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

अटलजींच्या जाहीर सभेने गाठला होता गर्दीचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:43 IST

ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या.

ठळक मुद्देदोन वेळा गडचिरोलीत सभा : पक्षनिधी म्हणून कार्यकर्त्यांनी दिली होती ३० हजार रुपयांची थैली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. राजकीय कारकिर्दीत दोन वेळा गडचिरोलीत जाहीर सभा घेणाऱ्या अटलजींची दुसरी सभा तर गडचिरोलीचा अनेक वर्षातील गर्दीचा उच्चांक गाठणारी ठरली. गुरूवारी सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.अटलजींची गडचिरोलीतील पहिली सभा १९८५ च्या सुमारास झाली होती. त्यावेळी ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. इंदिरा गांधी चौकातील श्याम टॉकीजच्या बाजुला असलेल्या खुल्या जागेवर ती जाहीर सभा झाली होती. त्यावेळी पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या ३० हजार रुपयांच्या निधीची थैली आणि तलवार त्यांना भेट देण्यात आली होती.दुसरी जाहीर सभा १९९६ मध्ये झाली. ही सभा वसंत विद्यालयाच्या पाठीमागच्या मैदानावर झाली होती. त्यावेळी राज्यात जेमतेम भाजप-सेनेचे युती सरकार सत्तेवर आले होते. महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही भाजपचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करीत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी झंझावती दौऱ्यावर निघाले होते. आज गडचिरोलीवासियांसाठी हेलिकॉप्टरचे दर्शन रोजचेच झाले असले तरी त्यावेळी अटलजींचे हेलिकॉप्टर शहरवासियांचे अप्रुप होते. राज्य मंत्रीमंडळातील तत्कालीन मंत्री नितीन गडकरी, शोभाताई फडणवीस यांच्यासह अ‍ॅड.दादाजी देशकर, लोकसभेचे उमेदवार विलास कोडाप, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार, बाबुराव कोहळे आदी मंचावर विराजमान होते.विरोधी पक्षनेते म्हणून लोकसभेत आपली छाप पाडणाºया अटलजींना ऐकण्यासाठी त्यावेळी गडचिरोली शहरासह जिल्हाभरातून लोक जमले होते. समर्थ यांच्या घरापासून तर आताच्या महिला रुग्णालयापर्यंत लोक सभेत बसले होते. त्यावेळी त्या भागात आतासारखी दुकाने, वॉल कंपाऊंड काहीही नव्हते. त्यामुळे धानोरा मार्गापर्यंत सर्व भाग मोकळा होता. त्या सभेत जिल्हा भाजपच्या वतीने अटलजींना ५ लाख रुपयांची थैली पक्षकार्यासाठी भेट देण्यात आली होती. त्या निवडणुकीनंतरच अटलजी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यानंतरही त्यांनी गडचिरोलीशी ऋणानुबंध कायम ठेवले.कवितेची दखल१९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटलजी पंतप्रधान झाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी श्रीनगर ते लाहोर ही बस सुरू केली होती. त्यावर आधारित ‘शांती का संदेश’ ही कविता भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत जंबेवार यांचे वडील आणि व्यवसायाने शिक्षक तथा कवी असलेले मधुकर जंबेवार यांनी आपल्या ‘मधुरांगन’ या हिंदी कवितासंग्रहात प्रकाशित केली होती. त्याची प्रत अटलजींना पाठविल्यानंतर त्यांनी आपल्या खासगी सचिवामार्फत जंबेवार यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानून आपल्यातील सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा परिचय दिला.कार्यकर्त्यांची प्रार्थनाअटलजींची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी गडचिरोली शहरालगतच्या सेमाना देवस्थान येथे प्रार्थना केली. यावेळी भारत खटी, दामोदर अरगेला, अनिल पोहनकर, प्रकाश अर्जुनवार, नंदू काबरा, अनिल कुनघाडकर, अविनाश महाजन, आनंद श्रृंगारपवार, विनोद देवोजवार, अंकित हेमके, डेडुजी राऊत आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा