शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

नाल्यावर पूल बांधकामासाठी आसरअल्लीवासीय एकवटले

By admin | Updated: September 9, 2014 23:28 IST

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून आसरअल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वरील अंकिसानजीकच्या येर्रावागू नाल्यावरील पूल गेल्या दोन वर्षांपासून तुटलेला आहे. परिणामी अतिवृष्टीमुळे

आसरअल्ली : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून आसरअल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वरील अंकिसानजीकच्या येर्रावागू नाल्यावरील पूल गेल्या दोन वर्षांपासून तुटलेला आहे. परिणामी अतिवृष्टीमुळे या परिसरातील तब्बल ५० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासन केवळ थातूरमातूर दुरूस्ती करून ग्रामस्थांची बोळवण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येर्रावागू नाल्यावर तत्काळ नव्याने पक्क्या स्वरूपाचा पूल उभारण्यात यावा या मागणीसाठी आसरअल्लीवासीय एकवटले आहेत.या नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी आसरअल्ली वासीयांनी लेखी निवदेनाद्वारे प्रशासनास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, अंकिसानजीकच्या येर्रावागू नाल्याच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी ७ लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र सदर दुरूस्तीच्या कामात निकृष्ठ साहित्याचा वापर संबंधीत कंत्राटदाराने केल्यामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर पूल पूर्णत: खचला आहे. यामुळे अंकिसा परिसरातील जवळपास ५० गावांचा संपर्क सिरोंचा तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. अंकिसा परिसरातील नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयस्थळी ये-जा करण्यासाठी दूसरा पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाने तत्काळ येर्रावागू नाल्यावर पूल उभारावा, अशी मागणी आसरअल्लीवासीयांनी केली आहे. तहसीलदाराला निवेदन देताना धर्मराजू किष्टया वडलाकोंडा, गजानन कलाक्षपवार, सुधाकर मिसरी, सरपंच लक्ष्मण सिडाम, राजू जैनवार, भाष्कर गुडिमेटला, संजय मारगोनी, समय्या तोटकरी आदी हजर होते. (वार्ताहर)