शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आष्टी शहर झाले बकाल

By admin | Updated: January 14, 2015 23:09 IST

जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. मात्र या ठिकाणी अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांमध्ये स्वच्छता,

सुधीर फरकाडे - आष्टीजिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. मात्र या ठिकाणी अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांमध्ये स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, नाल्यांचा उपसा याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नाकडे कानाडोळा करीत आहे. आष्टी ग्रामपंचायतीत एकूण ५ वार्ड असून १३ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. १० हजारावर लोकसंख्या असलेल्या आष्टीच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले चपराळा येथील देवस्थानमध्ये जाण्यासाठी आष्टी येथूनच जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक आष्टी येथे येतात. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदी किनाऱ्यावर असलेल्या इंग्रजकालीन विश्रामगृहाचे बांधकाम ब्रिटीशांनी केले. उंचावर असलेल्या या विश्रामगृहावरून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी व येथील निसर्गरम्य वातावरण प्रसन्न करणारे आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांची गर्दी आष्टी येथे पाहायला मिळते. मात्र या गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा अद्यापही झालेल्या नाहीत. छोटे- छोटे प्रश्न अजूनही कायम आहेत. यामध्ये वार्ड क्र. ४ मध्ये अडेटवार यांचे घरासमोरील रस्त्यावर विद्युत खांब गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. तो खांब अद्याप तेथून हटविण्यात आलेला नाही. आष्टी हे मुख्य मार्गावरचे ठिकाण आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असलेला चौक आहे. या चौकात नागरिकांची मोठी वर्दळ राहते. या चौकात अनेक खासगी वाहनेही उभे राहतात. चौकाच्या सौंदर्यीकरणाकडेही दुर्लक्ष आहे. वैनगंगा नदीवर असलेला पूल हा अरूंद व ठेंगणा आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी सोडल्यास वा अतिवृष्टी झाल्यास या पुलावरून पाणी वाहते व आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक बंद होते. या पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे. परंतु या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. आष्टी गावाचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गावाचा नियोजनही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन होण्याची गरज आहे. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आष्टीच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देण्याचे काम करीत आहेत.