शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हायवेवर जेवढे स्टॉप तेवढेच ढाबे; 'अन्ना'चे परवाने कोणाकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:51 IST

कारवाई होते का? : सीमावर्ती भागातील ढाब्यांवर पोलिसांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात गत काही वर्षांत राज्य व राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्याने आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे या महामार्गावर ढाब्यांचीही संख्या वाढली. जिल्ह्याच्या महामार्गांवर जेवढे वाहनथांबे आहेत. तेवढेच ढाबे निर्माण झालेले आहेत. या ढाबेचालकांकडे परवाने आहेत की नाही, हा मात्र चौकशीचा विषय आहे. जिल्ह्यात राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आहे. काही ठिकाणापर्यंत महामार्गाचे कामही पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या ढाब्यांची संख्या पुन्हा वाढू शकते. 

गडचिरोली- अहेरी- सिरोंचा मार्गावर सर्वाधिक ढाबे जिल्ह्यात गडचिरोली अहेरी सिरोंचा हा सर्वांत लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर सर्वाधिक ढाबे आहे. जवळपास ३० हून अधिक ढाबे या मार्गावर आहेत.

पाच वर्षांत तीन ढाब्यांवर कारवाई गत पाच वर्षांत कोरची तालुक्यातील दोन ढाब्यांवर तर कुरखेडा तालुक्यातील एका ढाब्यावर पोलिसांनी दारू विक्रीच्या संशयावरून धाड टाकून कारवाई केली. येथून दारूसाठा जप्त करण्यात आलेला होता.

ढाब्यासाठी परवानगी कोणाकोणाची हवी? ढाब्यासाठी एफएसएसएआय परवाना, खाण्याच्या घराचा परवाना, आरोग्य व्यापार परवाना, दारू (वैध असल्यास) विक्री परवाना, जीएसटी नोंदणी, पर्यावरणीय मंजुरी परवाना, अग्निसुरक्षा परवाना, लिफ्ट लायसन्स साइनेज परवाना, संगीत परवाना, दुकान आणि स्थापना परवाना, रेस्टॉरंट विमा आदी परवाने आवश्यक आहेत.

अन्न प्रशासनातर्फे कारवाई शून्य जिल्ह्यातील ढाब्यांमधील नमुन्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात नाही. यामुळे ढाब्यांमध्ये अवैध प्रकार चालतो. केवळ भोजनच नाही तर दारूचीही विक्री केली जाते. अशा ढाब्यांवर कारवाईची गरज आहे.

अन्न प्रशासनात मनुष्यबळाचा अभाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असतानाही केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सुरू आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhighwayमहामार्ग