शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

लोकसभेत आरमोरी क्षेत्र नेहमीच भाजपच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:30 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने आजपर्यंत झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने झुकते माप दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव नव्हताच. अशाही परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्राने लोकसभेत भाजपला सातत्याने आघाडी दिली आहे. ही परंपरा याही वेळी कायम राहिल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देशिवसेनेचा बालेकिल्ला हरवला : प्रत्येक लोकसभेला भाजपला आघाडी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने आजपर्यंत झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने झुकते माप दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव नव्हताच. अशाही परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्राने लोकसभेत भाजपला सातत्याने आघाडी दिली आहे. ही परंपरा याही वेळी कायम राहिल्याचे दिसून आले.एकेकाळी आरमोरी विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता मात्र हे विधानसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. सन १९९० पासून सतत तीन वेळा या विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. सन २००४ मध्ये काँग्रेसने सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले व सतत दोन वेळा या मतदार संघाने काँग्रेसच्या उमेदवाराला संधी दिली.सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. तेव्हाही या क्षेत्राने भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना १४ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी दिली होती. सन १९९६ पासून तर आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला झुकते माप देण्याची परंपरा या विधानसभा क्षेत्राने कायम राखली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांना ९० हजार ८८५ मते आरमोरी विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ४८ हजार २०८ मते मिळाली होती. म्हणजे मोदी लाटेत २०१४ मध्ये अशोक नेते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून ४२ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती.सन २०१९ च्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून खासदार अशोक नेते यांना ८९ हजार ५११ मते मिळाली. तर काँग्रेसचे डॉ.उसेंडी यांना ७२ हजार ३६९ मते मिळाली. यावेळी भाजपची मते थोडीफार कमी झालेली दिसतात. काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत २४ हजार पेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वाढले असले तरी भाजपचे खासदार अशोक नेते यांना १७ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी या क्षेत्रातून मिळाली आहे. सदर निवडणुकीत मोदी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. ग्रामीण व शहरी भागातील ओबीसी पट्ट्यात काँग्रेसपेक्षा भाजपने चांगली मते घेतली. तर आदिवासीबहुल भागात काँग्रेसने चांगली मते घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीत १२ हजार ७९४ अशी निर्णायक मते आरमोरी विधानसभा क्षेत्रातून घेतली.

टॅग्स :BJPभाजपा