शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

उन्हाचा तडाखा, जलस्रोत आटले; घोटभर पाण्यासाठी तडफडतोय मुक्या जनावरांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 13:16 IST

जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देवाढत्या तापमानात पाळीव प्राण्यांची पाण्यासाठी वनवन

रमेश मारगोनवार

भामरागड (गडचिरोली) : यावर्षी आठवडाभरापासून तापमानात मोठी वाढ होऊन असह्य उष्णतामान झाले आहे. यामुळे मनुष्यजीवांसह पशुपक्ष्यांनाही जोरदार फटका बसत आहे. जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी गावातील बोअरवेलजवळ पाळीव जनावरे जमत आहेत. कोणी पाण्याचा गुंड भरून नेल्यानंतर खाली टपकणाऱ्या घोटभर पाण्यासाठी या प्राण्यांचा जीव कासावीस होत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भामरागड तालुक्यात २०१९ पासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. अधूनमधून तालुक्यात अवकाळी पावसामुळे नदीनाल्यांचे पाणी स्रोत वाढले होते. त्यामुळे यंदा पाणी समस्या कमी जाणवेल असा अंदाज वर्तविला जात असतानाच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा वाढला.

ग्रामीण भागात पाणी टंचाई, चारा टंचाईचे सावट ओढवत आहे. भामरागड तालुक्यात इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा, बांडिया अशा नदी-नाल्यांची कमतरता नाही. परंतु पाणी जिरवा पाणी अडवा, अशा कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. पावसाळ्यात रुद्रावतार धारण करणाऱ्या पर्लकोटा नदीचा प्रवाह मे महिन्यात दम तोडण्याच्या मार्गावर आहे. यशिवाय काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊन बोअरवेलमधील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जून महिन्यापर्यंत भयावह परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता ग्रामीण भागात दिसत आहे.

या भागात जनावरांच्या मालकांना त्यांची फारसी काळजी नसते. धान कापणी झाल्यानंतर गाय-बैल सोडून देतात. ते जंगलात भटकत असतात. पुन्हा पावसाळा लागला की आपआपले गाय-बैल शोधून आणतात. परिणामी या भागातील पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

अनेक बोअरवेल पडताहेत बंद

बोअरवेलमध्ये पाणी तळ गाठायला लागल्याने एक गुंडभर पाण्यासाठी दांडा जोरजोरात मारून अनेक बोअरवेल बंद पडल्या आहेत. तालुक्यातील १२८ गावांसाठी एकच बोअरवेल दुरुस्ती पथक आहे. त्यामुळे वेळेवर दुरुस्ती होत नाही. परिणामी पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी दुरुस्ती पथक वाढविणे गरजेचे आहे. पर्याय व्यवस्था म्हणून गावातील विहिरीतील काडी कचरा काढून साफ करण्यासाठी पं.स. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीTemperatureतापमानweatherहवामान