शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

उन्हाचा तडाखा, जलस्रोत आटले; घोटभर पाण्यासाठी तडफडतोय मुक्या जनावरांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 13:16 IST

जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देवाढत्या तापमानात पाळीव प्राण्यांची पाण्यासाठी वनवन

रमेश मारगोनवार

भामरागड (गडचिरोली) : यावर्षी आठवडाभरापासून तापमानात मोठी वाढ होऊन असह्य उष्णतामान झाले आहे. यामुळे मनुष्यजीवांसह पशुपक्ष्यांनाही जोरदार फटका बसत आहे. जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहान भागविण्यासाठी गावातील बोअरवेलजवळ पाळीव जनावरे जमत आहेत. कोणी पाण्याचा गुंड भरून नेल्यानंतर खाली टपकणाऱ्या घोटभर पाण्यासाठी या प्राण्यांचा जीव कासावीस होत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भामरागड तालुक्यात २०१९ पासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. अधूनमधून तालुक्यात अवकाळी पावसामुळे नदीनाल्यांचे पाणी स्रोत वाढले होते. त्यामुळे यंदा पाणी समस्या कमी जाणवेल असा अंदाज वर्तविला जात असतानाच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा वाढला.

ग्रामीण भागात पाणी टंचाई, चारा टंचाईचे सावट ओढवत आहे. भामरागड तालुक्यात इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा, बांडिया अशा नदी-नाल्यांची कमतरता नाही. परंतु पाणी जिरवा पाणी अडवा, अशा कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. पावसाळ्यात रुद्रावतार धारण करणाऱ्या पर्लकोटा नदीचा प्रवाह मे महिन्यात दम तोडण्याच्या मार्गावर आहे. यशिवाय काही भागात जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊन बोअरवेलमधील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जून महिन्यापर्यंत भयावह परिस्थिती निर्माण होईल, अशी चिंता ग्रामीण भागात दिसत आहे.

या भागात जनावरांच्या मालकांना त्यांची फारसी काळजी नसते. धान कापणी झाल्यानंतर गाय-बैल सोडून देतात. ते जंगलात भटकत असतात. पुन्हा पावसाळा लागला की आपआपले गाय-बैल शोधून आणतात. परिणामी या भागातील पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

अनेक बोअरवेल पडताहेत बंद

बोअरवेलमध्ये पाणी तळ गाठायला लागल्याने एक गुंडभर पाण्यासाठी दांडा जोरजोरात मारून अनेक बोअरवेल बंद पडल्या आहेत. तालुक्यातील १२८ गावांसाठी एकच बोअरवेल दुरुस्ती पथक आहे. त्यामुळे वेळेवर दुरुस्ती होत नाही. परिणामी पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी दुरुस्ती पथक वाढविणे गरजेचे आहे. पर्याय व्यवस्था म्हणून गावातील विहिरीतील काडी कचरा काढून साफ करण्यासाठी पं.स. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीTemperatureतापमानweatherहवामान