शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जनावरांनाही होतो कॅन्सर; पशुपालकांनो, घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:32 IST

चिकित्सा केली का? दुग्ध व्यवसायावरही होतो परिणाम : वेळीच करावा औषधोपचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : माणसांसह जनावरांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जसे माणसांच्या आहार-विहारात बदल झाला तसेच बदल जनावरांच्या आहारात झालेला आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पशुपालकांनी योग्य काळजी घ्यावी.

जिल्ह्यात शेतीक्षेत्र बरेच आहे. येथील लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. याशिवाय अनेक शेतकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे शेती कसणाऱ्या जनावरांसह दुधाळ जनावरेसुद्धा आहेत. या जनावरांची काळजी कशी घ्यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असले तरी अनेक पशुपालकांना जनावरांमधील कर्करोगाची ओळख होत नाही. जनावरांमधील हा कर्करोग पशुपालकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकदा जनावरांचा अकाली मृत्यू होतो.

जनावरांतही प्रमाण वाढलेज्याप्रमाणे माणसाला कर्करोग होतो. अगदी त्याचप्रकारे जनावरांना कर्करोग होतो. पाळीव कुत्री, गायी, बैल, म्हशी आदींमध्येही कर्करोगाचे प्रमाण आहे.

कर्करोगाचे दोन प्रकारजनावरांमधील कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये बेनाइल (हळूहळू वाढणारा) व मॅलेग्नंट (जलद गतीने वाढणारा) आदी दोन प्रकारांचा समावेश आहे. सदर प्रकार वेळीच लक्षात येत नाहीत. परंतु काही लक्षणे दिसताच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

काय आहेत लक्षणे ?जनावरांमध्ये गाठी किंवा सूज, वजन कमी करणे, कमी खाणे-पिणे, काम करण्याची शक्ती कमी होणे, थकवा येतो. जनावरांमध्ये शिंगाचा आकार कमी कमी होत जातो, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास जाणवतो. याशिवाय श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.

काय काळजी घ्याल?पाळीव जनावरांच्या शिंगाना पेंट (वार्निस) लावला जातो. यामुळे सदर पेंट शिंगातून मांस पेशीत पोहोचतो. रंगामुळे पेशींना नुकसान होते. त्यामुळे पेंट लावू नये. जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही याची काळजी घ्यावी.

"प्लास्टिक पोटात गेल्याने फिनॉलिक कम्पाऊंड होऊन जनावरांच्या पेशीवर परिणाम होतो. याशिवाय विविध कारणांमुळे जनावरांना कर्करोग होत असल्याचेही दिसून आलेले आहे."- डॉ. सचिन ढालकरी, पशुधन विस्तार अधिकारी, चामोर्शी

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली