शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

संतप्त शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:35 IST

उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ...

उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी घिसू खुणे व दशरथ लाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पाेलीस निरीक्षकांना दिले. दिलेल्या तक्रारीवजा निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या उन्हाळी धान पीक जाेमात आहे. सुरवातीला या फीडरवरील कृषी पंपाना विद्युत पूरविणाऱ्या वाहीनीवर १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ४०० पेक्षा अधिक धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. या भागात रबी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड माेठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान कुरखेडा-वडसा मार्गावर आमदार कृष्णा गजबे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात दिवसभर चक्काजाम आंदोलन तसेच अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला होता. या आक्रमक आंदोलनाची दखल घेत त्यावेळी १६ तास भारनियमनाचा आदेश मागे घेत विद्युत पूरवठा सुरळीत करण्यात आला होता. यानंतर या परीसरातील शेतकऱ्यांंनी माेठी अपेक्षा बाळगुन उत्साहाने रबी हंगामात धानाची पेरणी केली. मात्र ऐन हंगामात पुन्हा मागे घेण्यात आलेल्या भारनियमनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून १६ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजतापर्यत विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. या आठ तासात धान पिकाला पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. धान पिकाला अधिक पाण्याची गरज असते. त्यामुळे परिसरातील धान पीक पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला आंदोलनानंतर सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन देत पुन्हा भारनियमन लागू करणे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. धान पिकाच्या होणाऱ्या नूकसानीला विद्युत वितरण कंपनीचा अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हटले आहे.