शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांविराेधात पाेलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:35 IST

उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ...

उन्हाळी धान पिकाच्या हाेणाऱ्या नुकसानीला विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जि. प. चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी घिसू खुणे व दशरथ लाडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पाेलीस निरीक्षकांना दिले. दिलेल्या तक्रारीवजा निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या उन्हाळी धान पीक जाेमात आहे. सुरवातीला या फीडरवरील कृषी पंपाना विद्युत पूरविणाऱ्या वाहीनीवर १६ तासाचे भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ४०० पेक्षा अधिक धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. या भागात रबी हंगामात उन्हाळी धान पिकाची लागवड माेठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान कुरखेडा-वडसा मार्गावर आमदार कृष्णा गजबे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात दिवसभर चक्काजाम आंदोलन तसेच अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला होता. या आक्रमक आंदोलनाची दखल घेत त्यावेळी १६ तास भारनियमनाचा आदेश मागे घेत विद्युत पूरवठा सुरळीत करण्यात आला होता. यानंतर या परीसरातील शेतकऱ्यांंनी माेठी अपेक्षा बाळगुन उत्साहाने रबी हंगामात धानाची पेरणी केली. मात्र ऐन हंगामात पुन्हा मागे घेण्यात आलेल्या भारनियमनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून १६ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजतापर्यत विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. या आठ तासात धान पिकाला पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. धान पिकाला अधिक पाण्याची गरज असते. त्यामुळे परिसरातील धान पीक पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला आंदोलनानंतर सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन देत पुन्हा भारनियमन लागू करणे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. धान पिकाच्या होणाऱ्या नूकसानीला विद्युत वितरण कंपनीचा अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे म्हटले आहे.