शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

अन् जि.प.च्या अधिकाऱ्यांनी खांद्यावर घेतले ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. त्या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ आहे.

ठळक मुद्देचिखल आणि नाल्यातून काढली वाट : दुर्गम मरकणार गावात मदत पोहोचवण्यासाठी करावी लागली कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पूरपरिस्थितीने बेजार झालेल्या भामरागड तालुक्यातील मरकणार या अतिदुर्गम गावात मदतरूपाने दैनंदिन गरजेचे साहित्य पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या खांद्यावर आणि डोक्यावर ओझे घेतले. एवढेच नाही तर डोंग्यातून नदी पार करून चिखलमय वाटेवरूनही पायी प्रवास केला. एरवी एसी केबिनमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील गावकऱ्यांच्या मदतीसाठी घेतलेली ही मेहनत त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीसोबत संवेदनशील मनाचा परिचय देणारी ठरली.जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला होता. त्या निधीतून गावकऱ्यांना लागणारे संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदी करून भामरागड तालुक्याच्या कोटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. त्या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ आहे. पण ते ५५ कुटुंब सततच्या पावसाने बेजार होऊन अतिशय विपरित परिस्थितीत जगत आहे. या गावाला चारही बाजूने नाल्याचे पाणी असल्याने त्या गावापर्यंत मदत पोहचू पोहोचवणे कठीण होते. पण जि.प.च्या अधिकाऱ्यांचा निर्धार पक्का होता. त्यानुसार मंगळवार २४ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या नेतृत्वात त्या गावी मदत पोहचवण्यासाठी निघालेल्या या पथकाने नाल्याच्या पाण्यातून लाकडी डोंग्यावरुन प्रवास केला आणि सर्व साहित्य पलीकडील तिरावर नेले. पण तेथून पुढे गावात जाण्यासाठी धड रस्ताही नव्हता. त्यामुळे चिखलातून वाट काढत सर्व अधिकारी-कर्मचारी आपापल्या डोक्यावर, खांद्यावर साहित्य घेऊन वाटचाल करत त्या गावात पोहोचले.यावळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुरले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चौहान, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्रीशांत कोडप, अभियंता अमित तुरकर, शाखा अभियंता खोकले, भामरागडचे गटविकास अधिकारी महेश ढोके, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, विस्तार अधिकारी देवारे यांच्यासह काही ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य केले.या साहित्याचे केले वाटपमदत साहित्यात तांदूळ, चना डाळ, तेल, मीठ, बिस्कीट, टोस्ट ब्लँकेट, ताडपत्री आदी साहित्य होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांनी यावेळी ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या पुढच्या चार महिन्यात बेली ब्रिज तयार झाल्यानंतर दूर होईल, असा दिलासा दिला. यानंतरही कुठली मदत हवी असेल तर सांगावे आम्ही मदत करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. अतिदुर्गम भागातील लोक कोणत्या परिस्थितीत जगतात हे पहिल्यांदाच या भेटीनिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद