शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गरोदर मातेच्या प्रसूतीसाठी खाट बनली रूग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:54 IST

भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करायचे होते. मात्र गावादरम्यान असलेल्या नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते.

ठळक मुद्देमिरगुडवंचाच्या नाल्याने अडविली वाट । प्रसूतीनंतर माता व बाळ सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करायचे होते. मात्र गावादरम्यान असलेल्या नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे तिचे कुटुंबिय व गावातील नागरिकांनी तिला खाटेवर आणून नाला पार केला. त्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी रूग्णालयात भरती करण्यात आले. तिची प्रसूती झाली असून बाळ व माता सुखरूप आहे.मिरगुडवंचा येथील बाली आकाश लेखामी हिला शनिवारी प्रसववेदना सुरू झाल्या. गावातील आशावर्कर प्रज्ञा दुर्वा हिने आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन गावापर्यंत रूग्णवाहिका आणावी, अशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. मिरगुडवंचा हे गाव भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर आहे. या गावापासून दीड किमी अंतरावर एक नाला आहे. या नाल्यावर पूल नाही. तसेच नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचविणे अशक्य असल्याची बाब डॉ. विजय मडावी यांनी महिलेला सांगितली. रूग्णवाहिका चालक पिंटूराज मंडलवार यांनी नाल्याच्या अलिकडेपर्यंत रूग्णवाहिका नेऊन ठेवली. गावापासून नाल्यापर्यंत महिलेला खाटेवर आणण्यात आले. रूग्णवाहिकेने आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला हेमलकसा येथील दवाखाण्यात भरती केले. डॉ. अनघा आमटे यांनी प्रसुती केली.पुलांअभावी तुटतो संपर्कभामरागड तालुका जंगलाने व्यापला आहे. या घनदाट जंगलात आदिवासींची लहान लहान गावे आहेत. गावाला जाताना नदी,नाले पडतात. या नाल्यांवर पुलांचे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांचा संपर्क तुटून जीवन खडतर बनते. मूलभूत गरजाही पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच एखाद्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्याचा जीव गेल्याशिवाय राहत नाही.रुग्णालयात जनजागृतीचा अभावघरी प्रसुती करणे धोकादायक आहे. त्यामुळे प्रसुती दिनांकाच्या काही दिवसाअगोदर गरोदर महिलेला रूग्णालयात भरती करून घेण्याचे निर्देश आहेत. मात्र याचे पालन आरोग्य यंत्रणा करीत नाही. तसेच दुर्गम भागातील महिलाही प्रसुतीपूर्वी काही दिवस अगोदर रूग्णालयात भरती होत नाही. रूग्णालयामध्ये प्रसुती होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती करण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य