शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांच्या काैटुंबिक कार्यासह मदतीवरही घातला बहिष्कार अन् गावात झाली दारूबंदी

By गेापाल लाजुरकर | Updated: May 30, 2023 13:48 IST

गायी-म्हशी राखण्यास गुराख्यांचीही ना : बामणपेठ्यात पाच वर्षांपासून सुव्यवस्था

गडचिरोली : ग्रामसभेने दारूविक्रेत्यांच्या कार्यक्रमाला कुणी जायचे नाही, अडीअडचणीत मदत करायची नाही. गुराख्यांनी त्यांच्या गायी-म्हशी राखायच्या नाही, अशा प्रकारे गावबंदीसारखा कठाेर निर्णय घेऊन गावातील दारूविक्रेत्यानी अवैध व्यवसाय पूर्णतः बंद केला. गावात दारूबंदी झाली. ह्या निर्णयामुळे गावाची प्रतिष्ठा वाढली. गावातील भांडण-तंटे कमी झाले. महिलांचे संसार सुरळीत सुरू आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून दारूविक्री मुक्त गाव म्हणून परिसरात ओळख मिळवली. ते गाव आहे बामणपेठ. येथे नुकतेच विजयस्तंभ उभारून अनावरण करण्यात आले.

चामोर्शी तालुक्यातील बामणपेठ हे गाव पाच वर्षांपूर्वी अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध होते. या गावात अवैध दारूविक्री केली जायची. त्यामुळे नेहमी भांडणतंट्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. महिलांना अन्याय-अत्याचार सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना गाव बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून हे गाव अवैध दारूविक्री मुक्त आहे. यावेळी पोलिस पाटील भाऊजी सिडाम, पेसा अध्यक्ष विठ्ठल कन्नाके, प्रभाकर कन्नाके, ग्रा.पं. सदस्य साईनाथ कुळमेथे, विजय कन्नाके, जानकीराम शेडमाके, दसरथ आत्राम, रावजी आत्राम, शैलेश शेडमाके, गोमा आत्राम, दिवाकर शेडमाके, वैशाली कंनाके, मंगला कनाके, चंद्रकला सिडाम, अनिता कन्नाके, मीना कन्नाके, ज्योती कतलाम, शकुंतला शेडमाके यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

विजयस्तंभाचे महत्त्व काय?

अवैध दारूविक्री बंदी झाल्याने गावात शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत हाेते. गावातील लाेकांनी दारविक्री बंदीसाठी केलेले कार्य व एकजूट गावकऱ्यांच्या स्मरणात नेहमी राहावी यासाठी गावात विजयस्तंभ उभारण्यात आले. मुक्तिपथ अभियानाचे आनंद सिडाम यांनी ग्रामस्थांना पेसा कायदा व विजयस्तंभाचे महत्त्व पटवून दिले.

टॅग्स :liquor banदारूबंदीGadchiroliगडचिरोली