शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी पूर्ण करण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:41 IST

२०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या ११५ विहिरी अपूर्णच : ३१ मार्चपूर्वी बांधकाम करण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.आदिवासी विकास विभागाच्या निधीतून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व समाज कल्याण विभागाच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. २०१७-१८ या वर्षात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गतसाठी ४३१ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी ४०१ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. ३४६ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काम सुरू न झालेल्या व काम सुरू असलेल्या विहिरी कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च पूर्वी पूर्ण करायच्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी २३ विहिरी मंजूर केल्या. सर्वच विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. त्यापैकी १८ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९९ विहिरी मंजूर केल्या. ८७ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. तर ७४ विहिरींचे पूर्ण झाले आहे. मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नसल्याने शासन विहीर बांधकामासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो विहिरी मंजूर केल्या जातात. मंजुरीचे वर्ष पकडले जात असले तरी बºयाच वेळी विहीर मंजुरीस त्यानंतर निधी प्राप्त होण्यास बराच कालावधी जातो. त्यानंतर पावसाळ्याला सुरूवात होते. पावसाळ्यात विहिरीचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसरा वर्ष उजाडतो. ज्या विहिरींच्या कामाला अजुनही सुरूवात झाली नाही किंवा ज्या विहिरींचे बांधकाम सुरू आहे, अशा शेतकºयांना ३१ मार्च पूर्वी विहीर पूर्ण करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी विहीर खोदली जाते. त्या ठिकाणची जागा मोकळी झाली असली तरी पोकलँड मशीन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याचबरोबर रेतीचीही प्रचंड टंचाई असल्याने विहिरींचे काम रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.२०१८-१९ मधील काम सुरूच झाले नाही२०१८-१९ या वर्षात ५७९ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गतमध्ये ४६५, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेरीलसाठी २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९३ विहिरींचा समावेश आहे. या विहिरींसाठी १३ कोटी ९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही विहिरीला कार्यारंभ आदेश दिला नाही. त्यामुळे याही विहिरींचे काम सुरू होण्याला विलंबच होणार आहे.