शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विहिरी पूर्ण करण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:41 IST

२०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या ११५ विहिरी अपूर्णच : ३१ मार्चपूर्वी बांधकाम करण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.आदिवासी विकास विभागाच्या निधीतून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व समाज कल्याण विभागाच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. २०१७-१८ या वर्षात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गतसाठी ४३१ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी ४०१ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. ३४६ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काम सुरू न झालेल्या व काम सुरू असलेल्या विहिरी कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च पूर्वी पूर्ण करायच्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी २३ विहिरी मंजूर केल्या. सर्वच विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. त्यापैकी १८ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९९ विहिरी मंजूर केल्या. ८७ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. तर ७४ विहिरींचे पूर्ण झाले आहे. मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नसल्याने शासन विहीर बांधकामासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो विहिरी मंजूर केल्या जातात. मंजुरीचे वर्ष पकडले जात असले तरी बºयाच वेळी विहीर मंजुरीस त्यानंतर निधी प्राप्त होण्यास बराच कालावधी जातो. त्यानंतर पावसाळ्याला सुरूवात होते. पावसाळ्यात विहिरीचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसरा वर्ष उजाडतो. ज्या विहिरींच्या कामाला अजुनही सुरूवात झाली नाही किंवा ज्या विहिरींचे बांधकाम सुरू आहे, अशा शेतकºयांना ३१ मार्च पूर्वी विहीर पूर्ण करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी विहीर खोदली जाते. त्या ठिकाणची जागा मोकळी झाली असली तरी पोकलँड मशीन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याचबरोबर रेतीचीही प्रचंड टंचाई असल्याने विहिरींचे काम रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.२०१८-१९ मधील काम सुरूच झाले नाही२०१८-१९ या वर्षात ५७९ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गतमध्ये ४६५, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेरीलसाठी २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९३ विहिरींचा समावेश आहे. या विहिरींसाठी १३ कोटी ९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही विहिरीला कार्यारंभ आदेश दिला नाही. त्यामुळे याही विहिरींचे काम सुरू होण्याला विलंबच होणार आहे.