शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

विहिरी पूर्ण करण्यासाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:41 IST

२०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या ११५ विहिरी अपूर्णच : ३१ मार्चपूर्वी बांधकाम करण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.आदिवासी विकास विभागाच्या निधीतून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व समाज कल्याण विभागाच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. २०१७-१८ या वर्षात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गतसाठी ४३१ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी ४०१ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. ३४६ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काम सुरू न झालेल्या व काम सुरू असलेल्या विहिरी कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च पूर्वी पूर्ण करायच्या आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी २३ विहिरी मंजूर केल्या. सर्वच विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. त्यापैकी १८ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९९ विहिरी मंजूर केल्या. ८७ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. तर ७४ विहिरींचे पूर्ण झाले आहे. मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नसल्याने शासन विहीर बांधकामासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो विहिरी मंजूर केल्या जातात. मंजुरीचे वर्ष पकडले जात असले तरी बºयाच वेळी विहीर मंजुरीस त्यानंतर निधी प्राप्त होण्यास बराच कालावधी जातो. त्यानंतर पावसाळ्याला सुरूवात होते. पावसाळ्यात विहिरीचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसरा वर्ष उजाडतो. ज्या विहिरींच्या कामाला अजुनही सुरूवात झाली नाही किंवा ज्या विहिरींचे बांधकाम सुरू आहे, अशा शेतकºयांना ३१ मार्च पूर्वी विहीर पूर्ण करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी विहीर खोदली जाते. त्या ठिकाणची जागा मोकळी झाली असली तरी पोकलँड मशीन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याचबरोबर रेतीचीही प्रचंड टंचाई असल्याने विहिरींचे काम रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.२०१८-१९ मधील काम सुरूच झाले नाही२०१८-१९ या वर्षात ५७९ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गतमध्ये ४६५, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेरीलसाठी २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९३ विहिरींचा समावेश आहे. या विहिरींसाठी १३ कोटी ९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही विहिरीला कार्यारंभ आदेश दिला नाही. त्यामुळे याही विहिरींचे काम सुरू होण्याला विलंबच होणार आहे.