शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:46 IST

अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांचे घोटाळे उघडकीस येऊनही

जि.प. उपाध्यक्षांवरही नाराजी : आश्वासन पाळले नसल्याचा आरोप प्रशांत ठेपाले   आलापल्ली अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांचे घोटाळे उघडकीस येऊनही त्याची साधी चौकशी सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एक महिन्यापूर्वी आलापल्ली ग्राम पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत सदर ग्रामपंचायतीचे अनेक घोटाळे उघडकीस आले. यामध्ये प्रामुख्याने सचिवाने स्वत:च्या नावाने पैशाची उचल केली आहे. तर काही सदस्यांच्या नावे सुध्दा धनादेश वटविण्यात आले. तसेच यात काही ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने सुध्दा धनादेश देण्यात आले आहे. सदर रक्कम ही नेमकी कशासाठी देण्यात आली, याचा खुलासा ग्रामसभेत सचिवाला करता आला नाही. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार हे सुध्दा उपस्थित होते. आलापल्ली ग्राम पंचायतीच्या इतिहासात सर्वाधिक गाजलेली व रात्री उशिरापर्यंत चाललेली ही ग्रामसभा चर्चेचा विषय ठरली. याप्रसंगी उपस्थित असलेले जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना आलापल्ली येथे ग्राम विकास अधिकाऱ्याचे पद असून प्रभारी ग्रामसेवक आपल्या पदाचा गैरवापर करीत आहे. येथे ग्राम विकास अधिकारी नियुक्त करतो. तसेच ग्रामसभेमध्ये खर्चाचा हिशोब न लागल्याने त्यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला याची माहिती दिली. रेकॉर्ड जप्त करायला लावला. आलापल्लीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. मात्र महिना लोटला. परंतु कंकडालवार यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उल्लेखनिय बाब म्हणजे, आलापल्ली क्षेत्राचे प्रतिनिधीत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार करीत आहेत, असे असताना ही परिस्थिती आहे. याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. आलापल्ली ग्राम पंचायतीच्या परिस्थितीमुळे सर्वच प्रकारचे विकासकामे अडलेले आहेत. १४ वा वित्त आयोग, पेसा अंतर्गत सर्व कामे ठप्प असून तेंदू लिलावही दोनवेळा रद्द करावा लागला. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. ग्रा.पं.च्या कारभाराची चौकशी कुणी रखडविली ? अहेरी पंचायत समितीपासून सात किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड जप्त झाल्यापासून पंचायत समितीत चौकशीसाठी कोणीही आले नाही. ग्रामसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडून एक महिन्याचा कालावधी लोटला. चौकशी करायला विलंब का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी महिनाभरापूर्वी दिलेले चौकशीचे आश्वासन सध्या हवेतच विरले आहे. तसेच गावात पाण्याची समस्याही भीषण प्रमाणात उद्भवली असून मागील आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे, असे असताना या समस्येकडेही जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे दुर्लक्ष झाले आहे.