शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अहेरीतील दूरसंचार सेवा कोलमडली

By admin | Updated: September 3, 2016 01:28 IST

मागील १५ दिवसांपासून अहेरीतील भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरमध्ये बिघाड निर्माण झाला असल्याने कॉलड्राप होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कॉलड्राप होण्याचे प्रकार वाढलेअहेरी : मागील १५ दिवसांपासून अहेरीतील भारत संचार निगम लिमिटेडच्या टॉवरमध्ये बिघाड निर्माण झाला असल्याने कॉलड्राप होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बीएसएनएलचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईलवर बोलत असतानाच अचानक पूर्णपणे कव्हरेज जाणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे, अर्ध्यामध्येच फोन कटने, फोन न लागताच पैसे कटण्यास सुरूवात होणे याबाबी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अहेरी व अहेरी परिसरातील मोबाईलधारक कमालीचे त्रस्त झाले आहे. बीएसएनएलच्या चुकीमुळे ग्राहकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. याबाबत काही नागरिकांनी अहेरी व गडचिरोली येथील कार्यालयाकडे तक्रारही दाखल केली आहे. मात्र नित्याचीच बाब समजून बीएसएनएलचे अधिकारी टॉवरमधील बिघाड दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. अहेरी येथे भामरागड, सिरोंचा, एटापल्ली येथीलही नागरिक कामानिमित्त येतात. त्यामुळे मोबाईलधारकांची संख्या वाढली आहे. परिणामी दिवसभरात कॉलड्राप होण्याचे प्रकार वाढले असल्याने मोबाईल ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)