शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील मगरीमुळे नागरिकांमध्ये वाढली उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती.

ठळक मुद्देभीतीचे वातावरण : सुरक्षेची खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात नागरिकांना वारंवार मगरीचे दर्शन होत असल्यामुळे मगर पाहण्यासाठी या तलावाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पण सोबतच भीतीचेही वातावरणही निर्माण झाले आहे. अनेकांना मगरीचे दर्शन झाले असल्याने लोक विविध प्रकारची चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. मगरीपासून धोका होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती. याचाच या तलावात त्यावेळी मगरीचा मागमूसही नव्हता. त्यानंतरच्या काळात भरपूर पाऊस झाल्यामुळे हा तलाव कोरडा पडला नाही.पावसाळ्याच्या पुरात कुठूनतरी मगरीचे पिल्लू वाहत आले असावे. त्या नर-मादीमुळे या ठिकाणी एका पेक्षा अधिक मगरी असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील पिल्लू मोठी झाल्याने तलावाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असावी, अशी शंका येत आहे. या तलावाच्या काठावर महादेवाचे नाग मंदिर असल्याने येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. निर्माल्य विसर्जन ही नित्याची बाब झाली आहे. या तलावातील मगरीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, तशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.तलाव सौंदर्यीकरणाच्या मागणीला जोरचामोर्शी शहरात विरंगुळा व मनोरंजनाचे कोणतेही मोठे साधन नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या एकमेव तलावाचे सौंदर्यीकरण करून तेथे नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्यास नगर पंचायतीच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे सदर तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास मगरीसारख्या प्राण्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही. पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल. तसेच चामोर्शीकरांसाठी विरंगुळ्याचे चांगले स्थळ निर्माण होईल, असा नागरिकांमध्ये सूर आहे.सदर तलावात भरपूर पाणी असल्याने येथील मगरीला पकडणे सध्या अशक्य आहे. या तलावातील पाणी कमी होताच मगरीला पकडले जाईल. तोपर्यंत नागरिकांनी तसेच या तलावात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तलावाच्या पाळीवरून ये-जा करणाऱ्यांनीही विशेष खबरदारी घ्यावी.- प्रवीण लेले,वनपरिक्षेत्राधिकारी, चामोर्शीतलावातील मगरीला पकडणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. वनविभाग आम्हाला जे सहकार्य मागेल ते सहकार्य आम्ही करू.- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी