शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
5
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
6
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
7
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
8
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
9
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
10
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
11
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
12
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
14
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
15
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
16
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
17
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
18
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
19
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
20
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

तलावातील मगरीमुळे नागरिकांमध्ये वाढली उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती.

ठळक मुद्देभीतीचे वातावरण : सुरक्षेची खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात नागरिकांना वारंवार मगरीचे दर्शन होत असल्यामुळे मगर पाहण्यासाठी या तलावाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पण सोबतच भीतीचेही वातावरणही निर्माण झाले आहे. अनेकांना मगरीचे दर्शन झाले असल्याने लोक विविध प्रकारची चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. मगरीपासून धोका होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती. याचाच या तलावात त्यावेळी मगरीचा मागमूसही नव्हता. त्यानंतरच्या काळात भरपूर पाऊस झाल्यामुळे हा तलाव कोरडा पडला नाही.पावसाळ्याच्या पुरात कुठूनतरी मगरीचे पिल्लू वाहत आले असावे. त्या नर-मादीमुळे या ठिकाणी एका पेक्षा अधिक मगरी असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील पिल्लू मोठी झाल्याने तलावाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असावी, अशी शंका येत आहे. या तलावाच्या काठावर महादेवाचे नाग मंदिर असल्याने येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. निर्माल्य विसर्जन ही नित्याची बाब झाली आहे. या तलावातील मगरीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, तशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.तलाव सौंदर्यीकरणाच्या मागणीला जोरचामोर्शी शहरात विरंगुळा व मनोरंजनाचे कोणतेही मोठे साधन नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या एकमेव तलावाचे सौंदर्यीकरण करून तेथे नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्यास नगर पंचायतीच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे सदर तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास मगरीसारख्या प्राण्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही. पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल. तसेच चामोर्शीकरांसाठी विरंगुळ्याचे चांगले स्थळ निर्माण होईल, असा नागरिकांमध्ये सूर आहे.सदर तलावात भरपूर पाणी असल्याने येथील मगरीला पकडणे सध्या अशक्य आहे. या तलावातील पाणी कमी होताच मगरीला पकडले जाईल. तोपर्यंत नागरिकांनी तसेच या तलावात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तलावाच्या पाळीवरून ये-जा करणाऱ्यांनीही विशेष खबरदारी घ्यावी.- प्रवीण लेले,वनपरिक्षेत्राधिकारी, चामोर्शीतलावातील मगरीला पकडणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. वनविभाग आम्हाला जे सहकार्य मागेल ते सहकार्य आम्ही करू.- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी