शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही मृतदेह भोगतात यातना

By admin | Updated: April 25, 2015 01:43 IST

मागील दोन वर्षांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील शीतपेटी बंद अवस्थेत आहे.

प्रतीक मुधोळकर अहेरीमागील दोन वर्षांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील शीतपेटी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मृतदेह बाहेर ठेवावा लागत असून अनेक मृतदेहाची दुर्गंधीही सुटत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शवविच्छेदन गृहातील विद्युत पुरवठा बंद असल्याने एका सोलर लाईटच्या भरवशावर शवविच्छेदन करावे लागत आहे. त्यामुळे मृतदेहावर मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची पाळी येत आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी तालुक्यातील अनेक दुर्गम भागातून नागरिक उपचारासाठी येतात. कधीकधी उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू सुद्धा होतो. मात्र आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या गरीब जनतेला मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर लगेच मृतदेह स्वगावी नेणे शक्य नाही. त्यासाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयाला प्रशासनाने शीतपेटी उपलब्ध करून दिली आहे. मात्र सदर शीतपेटी बंद असल्याने रात्रभर मृतदेह शवगृहात बाहेरच ठेवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रात्रभर मृतदेह राहल्याने सदर मृतदेहाची दुर्गंधीही सुटते. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने नेहमी चकमकीच्या घटना घडतात. नक्षल्याकडून हत्या तसेच अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतात. या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणले जाते. रात्रीच्या वेळेस शवविछेदन केल्यास मृतदेह गावाकडे नेण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. अशा वेळी मृतदेह रूग्णालयात ठेवावे लागतो. शव विच्छेदन गृहाचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे त्याच्या स्वच्छतेवरही दुर्लक्ष होत आहे. साफसफाईसाठी येथे पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या शवविच्छेदनाचे रक्त ओट्यावरच पडून असते. त्यातून अनेकदा दुर्गंधी येते. विच्छेदन गृहाचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळे शव ठेवले असतांना कुत्रे किंवा अन्य प्राणी मृतदेहाचे लचके तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शवविच्छेदन गृहाला लागूनच जिल्हा परिषदेचे विश्रामगृह आहे व पुढील भागात नागरिकांची घरे आहेत. त्यांना सुद्धा या दुर्गंधीचा सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. शवविच्छेदनानंतर रक्ताने माखलेले कपडे सुद्धा तिथेच फेकल्या जातात. सोलर लाईट लागण्याच्या आधी विद्युत नसल्यामुळे मेणबत्ती किंवा टॉर्चच्या सहाय्याने शवविच्छेदन केल्या जात होते.