शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मृत्यूनंतरही मृतदेह भोगतात यातना

By admin | Updated: April 25, 2015 01:43 IST

मागील दोन वर्षांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील शीतपेटी बंद अवस्थेत आहे.

प्रतीक मुधोळकर अहेरीमागील दोन वर्षांपासून अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहातील शीतपेटी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मृतदेह बाहेर ठेवावा लागत असून अनेक मृतदेहाची दुर्गंधीही सुटत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शवविच्छेदन गृहातील विद्युत पुरवठा बंद असल्याने एका सोलर लाईटच्या भरवशावर शवविच्छेदन करावे लागत आहे. त्यामुळे मृतदेहावर मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची पाळी येत आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा व अहेरी तालुक्यातील अनेक दुर्गम भागातून नागरिक उपचारासाठी येतात. कधीकधी उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू सुद्धा होतो. मात्र आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसलेल्या गरीब जनतेला मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर लगेच मृतदेह स्वगावी नेणे शक्य नाही. त्यासाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयाला प्रशासनाने शीतपेटी उपलब्ध करून दिली आहे. मात्र सदर शीतपेटी बंद असल्याने रात्रभर मृतदेह शवगृहात बाहेरच ठेवावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात रात्रभर मृतदेह राहल्याने सदर मृतदेहाची दुर्गंधीही सुटते. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने नेहमी चकमकीच्या घटना घडतात. नक्षल्याकडून हत्या तसेच अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतात. या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणले जाते. रात्रीच्या वेळेस शवविछेदन केल्यास मृतदेह गावाकडे नेण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. अशा वेळी मृतदेह रूग्णालयात ठेवावे लागतो. शव विच्छेदन गृहाचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे त्याच्या स्वच्छतेवरही दुर्लक्ष होत आहे. साफसफाईसाठी येथे पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. त्यामुळे पूर्वी झालेल्या शवविच्छेदनाचे रक्त ओट्यावरच पडून असते. त्यातून अनेकदा दुर्गंधी येते. विच्छेदन गृहाचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत. त्यामुळे शव ठेवले असतांना कुत्रे किंवा अन्य प्राणी मृतदेहाचे लचके तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शवविच्छेदन गृहाला लागूनच जिल्हा परिषदेचे विश्रामगृह आहे व पुढील भागात नागरिकांची घरे आहेत. त्यांना सुद्धा या दुर्गंधीचा सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. शवविच्छेदनानंतर रक्ताने माखलेले कपडे सुद्धा तिथेच फेकल्या जातात. सोलर लाईट लागण्याच्या आधी विद्युत नसल्यामुळे मेणबत्ती किंवा टॉर्चच्या सहाय्याने शवविच्छेदन केल्या जात होते.