शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षांनी अमडेलीत गेलेली बस पुन्हा धावलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:11 IST

पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मोठा गाजावाजा करून आपल्या मतदारसंघातल्या अमडेली गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस नेली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केली दिशाभूल : गावकºयांची संतप्त भावना, एसटी गावात आल्याचा आनंद ठरला औटघटकेचा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मोठा गाजावाजा करून आपल्या मतदारसंघातल्या अमडेली गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस नेली. एवढेच नाही तर स्वत: त्या बसनेच ते गावातही गेले. आता कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली असून ही बस दररोज आपल्या गावात येणार याचा अत्यानंद गावकºयांना झाला. पण हा आनंद औटघटकेचा ठरला. पालकमंत्री माघारी फिरताच ती बस पुन्हा त्या रस्त्याने धावलीच नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली दिशाभूल केली, अशी संतप्त भावना त्या परिसरातील गावकरी जाहीरपणे व्यक्त करीत आहेत.राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विधानसभा मतदारसंघात येणारे अमडेली गाव वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ स्थितीत आहे. ‘गाव तिथे एसटी बस’ हे महामंडळाचे ब्रिदवाक्य असले तरी या गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षातही बस पोहोचली नाही. कार्यकर्त्यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच गेल्या २७ सप्टेंबरला पालकमंत्र्यांनी गावात बस नेण्याचे फर्मान सोडले. मग काय, बस जाण्यायोग्य रस्ता आहे का, नाल्यांवर पूल आहे का, या मार्गावरील प्रवास सुरक्षित राहील का वगैरे कोणत्याही बाबी तपासण्याची संधी मिळाली नसतानाही आदेशाप्रमाणे अहेरी आगाराच्या अधिकाºयांनी अमडेलीत नेण्यासाठी बस सज्ज केली. पालकमंत्री स्वत: बसमध्ये स्वार झाले. त्यांच्यासोबत एसटी महामंडळाचे अहेरी आगार व्यवस्थापक युवराज राठोड, बसस्थानक प्रमुख जे.बी. राजवैद्य, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, वाहतूक निरिक्षक बंडू तिलगामे, एस.के. डेरकर, चालक आर. जैसवाल, व्ही.एस.दुर्गे यांच्यासह पालकमंत्र्यांचे कार्यकर्तेही बसले. एस.टी.बस घेऊन प्रत्यक्ष अहेरी स्टेटचे राजे गावात आल्यामुळे गावकºयांचे चेहरे उजळून निघाले. नियोजित कार्यक्रम आटोपून पालकमंत्री रवाना झाल्यानंतर गावकरी आता आपली पायपीट थांबणार म्हणून आनंदात रममान होऊन दुसºया दिवशी, तिसºया दिवशी बसची वाट पाहू लागले, पण एक महिना लोटला तरी त्या गावात पुन्हा बस दिसलीच नाही. यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. पालकमंत्र्यांनी गावकºयांची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी अहेरी आगार व्यवस्थापकांसह सिरोंचाचे प्र.तहसीलदार एस.एस.इंगळे, ना.तहसीलदार राहुल वाघ व इतर अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देताना आदिवासी विद्यार्थी संघाचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, रवी सल्लमवार, इरपा मडावी, सडवली जनगाम, सन्मय चौधरी, खिसा वेमुला व अमडेली येथील गावकरी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षात ज्या गावाचे मागासलेपण दूर झाले नाही त्यांना नवीन सरकारच्या कार्यकाळातही ‘अच्छे दिन’ पहायला मिळणारच नाही का? असा प्रश्न या परिस्थितीवरून समोर येत आहे.राजेंच्या इच्छेला राजवैद्यांनी घातला लगामपालकमंत्री राजे अम्ब्रिशराव यांच्या इच्छेखातर एक दिवस अहेरी आगाराने अमडेली गावात कशीबशी बस नेली. पण प्रत्यक्षात तो रस्ता बस जाण्याच्या लायकीचाच नसल्याचे अहेरी बस स्थानक प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांनी सांगितले. अगदी अरुंद रस्ता, तो सुद्धा सरळ नाही. कोणतेही बसफेरी सुरू करण्याआधी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता योग्य आहे का, याचे सर्व्हेक्षण करावे लागते. वास्तविक आधी संबंधित विभागाला सूचना करून रस्ता, पूल सुसज्ज करायला पाहीजे होते. आम्ही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बसफेरी चालवू शकत नाही, असे राजवैद्य ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.अन् पालकमंत्र्यांची बस पुलावरच फसलीगेल्या २७ सप्टेंबरला पालकमंत्र्यांना घेऊन अमडेलीकडे निघालेली बस गावाजवळच्या नाल्यावरून सुरक्षितपणे जावी म्हणून पोलीस दलाने नाल्यावर सिमेंटचे पाईप टाकून माती व दगडांचा एक तात्पुरता पूल बांधला. पण पालकमंत्र्यांची बस त्या पुलावर शेवटी फसलीच. शेवटी बसमधील सर्वांना खाली उतरवून बसचे फसलेले चाक काढावे लागले. त्यामुळे या रस्त्यावरून बसफेरी सुरू करण्याआधी रस्ता, पूल चांगला करणे गरजेचे आहे याची कल्पना पालकमंत्र्यांनाही आहे. असे असताना बसफेरी सुरू करण्याची स्टंटबाजी का केली? असा सवाल आविसंच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग अजुनही झोपेतचसिरोंचा-अमडेली-चिटूर या मार्गे आसरअल्ली बसफेरी सुरू करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. गावात बस येत नसल्यामुळे दोन गावातील नागरिकांना अमडेलीपासून अहेरी रस्त्याला लागून असलेल्या तमदाला फाट्यापर्यंत १२ किलोमीटर पायी जाऊन सिरोंचा या तालुका मुख्यालयी यावे लागते. तसेच अमडेलीवरून वडदम फाट्यापर्यंत १४ किलोमीटर अंतर पायी तुटवत यावे लागते. वडदम फाट्यापासून अमडेली या गावापर्यंत गिट्टी मुरूम टाकून अमडेली या गावापर्यंत खडीकरण झाले आहे. पण रस्ता अत्यंत अरुंद आहे. शिवाय दोन छोट्या व एक मोठा नाला पार करताना पूल नाही. तरीही बांधकाम विभाग अद्याप झोपेत आहे.