शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

झेरॉक्स कागदपत्रावरही केली होती अ‍ॅडमिशन

By admin | Updated: March 6, 2015 01:24 IST

आलापल्ली येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ झेरॉक्स कागदपत्रावर प्रवेश देण्यात आले.

आलापल्ली : आलापल्ली येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ झेरॉक्स कागदपत्रावर प्रवेश देण्यात आले. याच विद्यार्थ्यांनी शहरातील दुसऱ्याही महाविद्यालयातून प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही. तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत सुचनाही महाविद्यालयाकडून मिळाली नसल्याने परीक्षेपासून वंचित राहिले. गतवर्षी काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती उचलण्यात आली. ही माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. कॉलेजच अचानक गायब झाल्याचे वृत्त ५ मार्च रोजी लोकमतमध्ये झळकताच ज्या विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेशासासाठी महाविद्यालयात मुळ कागदपत्रे दिली होती. ते विद्यार्थी आता आपले मुळ कागदपत्र मिळविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याकडे कॉलेजच्या चाव्या असतांना सायंकाळच्या सुमारास अचानक एक दिवस कॉलेजचे साहित्य लांबविण्यात आले. यामध्ये १४ संगणक, २५ डेक्स- बेंच, आलमारी, खुर्च्या, कार्यालयीन कागदपत्र असल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी कॉलेज अचानक कसं काय हलवून राहिले, अशी विचारणा सामान नेणाऱ्यांना केली असता, कॉलेज आष्टी येथे स्थानांतरीत होत असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी आज लोकमतशी बोलतांना दिली. कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून पगार न देणे तसेच घरमालक, कर्मचारी तसेच कॉलेजमधील प्रवेशधारक विद्यार्थ्यांना सूचना न देता, चालू शैक्षणिक वर्षात अचानकपणे कॉलेज रातोरात स्थानांतरण करणे, स्थानांतरणाची कोणतीही सूचना फलक लावून न देणे. आदिवासी विकास विभागाच्या पत्राला उत्तर न देणे या सर्व बाबी शिष्यवृत्ती घोटाळ्यात या महाविद्यालयाने काहीतरी रक्कम उचल केल्याच्या प्रकाराला बळकटी देणाऱ्या आहेत. अहेरीच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणी संबंधित संस्थाचालकाच्या विरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी या भागातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याचीही काळजी आदिवासी विकास विभागाने घ्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. (वार्ताहर)आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्या तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी सुरूवात केली. मात्र त्यावेळी महाविद्यालय बंद स्थितीत असल्याने दस्तावेज समितीला मिळाले नाही. संस्थेला लेखी स्वरूपात कागदपत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. या संदर्भात दोन दिवसात कागदपत्र सादर न झाल्यास संबंधित संस्थेविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसा अहवालही आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नाशिक यांना पाठविण्यात आला आहे. - एन. एस. मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी, अहेरी