शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

झेरॉक्स कागदपत्रावरही केली होती अ‍ॅडमिशन

By admin | Updated: March 6, 2015 01:24 IST

आलापल्ली येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ झेरॉक्स कागदपत्रावर प्रवेश देण्यात आले.

आलापल्ली : आलापल्ली येथील महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना केवळ झेरॉक्स कागदपत्रावर प्रवेश देण्यात आले. याच विद्यार्थ्यांनी शहरातील दुसऱ्याही महाविद्यालयातून प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महात्मा गांधी कॉलेजमध्ये गतवर्षी प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही. तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत सुचनाही महाविद्यालयाकडून मिळाली नसल्याने परीक्षेपासून वंचित राहिले. गतवर्षी काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात आले होते. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती उचलण्यात आली. ही माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. कॉलेजच अचानक गायब झाल्याचे वृत्त ५ मार्च रोजी लोकमतमध्ये झळकताच ज्या विद्यार्थ्यांनी यंदा प्रवेशासासाठी महाविद्यालयात मुळ कागदपत्रे दिली होती. ते विद्यार्थी आता आपले मुळ कागदपत्र मिळविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याकडे कॉलेजच्या चाव्या असतांना सायंकाळच्या सुमारास अचानक एक दिवस कॉलेजचे साहित्य लांबविण्यात आले. यामध्ये १४ संगणक, २५ डेक्स- बेंच, आलमारी, खुर्च्या, कार्यालयीन कागदपत्र असल्याची माहिती आहे. काही नागरिकांनी कॉलेज अचानक कसं काय हलवून राहिले, अशी विचारणा सामान नेणाऱ्यांना केली असता, कॉलेज आष्टी येथे स्थानांतरीत होत असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी आज लोकमतशी बोलतांना दिली. कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून पगार न देणे तसेच घरमालक, कर्मचारी तसेच कॉलेजमधील प्रवेशधारक विद्यार्थ्यांना सूचना न देता, चालू शैक्षणिक वर्षात अचानकपणे कॉलेज रातोरात स्थानांतरण करणे, स्थानांतरणाची कोणतीही सूचना फलक लावून न देणे. आदिवासी विकास विभागाच्या पत्राला उत्तर न देणे या सर्व बाबी शिष्यवृत्ती घोटाळ्यात या महाविद्यालयाने काहीतरी रक्कम उचल केल्याच्या प्रकाराला बळकटी देणाऱ्या आहेत. अहेरीच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणी संबंधित संस्थाचालकाच्या विरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी या भागातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याचीही काळजी आदिवासी विकास विभागाने घ्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. (वार्ताहर)आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्या तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी सुरूवात केली. मात्र त्यावेळी महाविद्यालय बंद स्थितीत असल्याने दस्तावेज समितीला मिळाले नाही. संस्थेला लेखी स्वरूपात कागदपत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. या संदर्भात दोन दिवसात कागदपत्र सादर न झाल्यास संबंधित संस्थेविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसा अहवालही आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नाशिक यांना पाठविण्यात आला आहे. - एन. एस. मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी, अहेरी