शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

१७४ वीज चोरांवर कारवाई

By admin | Updated: January 1, 2017 01:30 IST

विविध क्लुप्त्यांचा वापर करून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे काम महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

वीज पुरवठा खंडीत केला : १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर दरम्यान मोहीम गडचिरोली : विविध क्लुप्त्यांचा वापर करून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे काम महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. १ एप्रिल २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे १७४ वीज चोरांवर महावितरणच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. तपासणीची मोहीम अजुनही सुरूच आहे. महावितरणच्या वतीने वीज चोरीला आळा घालण्यासाठी संगणकीकृत मिटर बसविण्यास सुरूवात केली आहे. तरीही ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांच्या घरी अजुनही जुने मिटर आहेत. संगणकीकृत मिटरमध्येही काही नागरिक काळ्या करतात. मिटरमधील कॉईलची लांबी कमी करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे, मिटर बायपास करणे, विनामिटर वीज वापर करणे, मिटरमध्ये रेजिस्टन्स टाकणे, मुख्य तारेवर आकोडा टाकणे आदी क्लुप्त्या लढवून वीज चोरी केली जाते. विशेष करून ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. शहरी भागातीलही काही नागरिक या क्लुप्त्यांचा वापर करतात. यामुळे महावितरण कंपनीला महिन्याला लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. महावितरणने वीज चोरी करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकही नेमण्यात आले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत सुमारे १७४ वीज चोरांवर कारवाई केली आहे. यामध्ये गडचिरोली विभागातील १०८, आलापल्ली विभागातील ६६ वीज ग्राहकांचा समावेश आहे. या वीज ग्राहकांविरोधात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली मंडळात ब्रह्मपुरी विभागाचाही समावेश होतो. या विभागात २०१ ग्राहक वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले. गडचिरोली, ब्रह्मपुरी व आलापल्ली विभागातील एकूण ३७५ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी) २२ लाखांची चोरी उघडकीस गडचिरोली वीज मंडळांतर्गत येत असलेल्या ब्रह्मपुरी, आलापल्ली व गडचिरोली वीज विभागांतर्गत एकूण ३७५ वीज चोऱ्या आढळून आल्या आहेत. या वीज चोरांनी सुमारे २१ लाख ८२ हजार रूपयांची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित ग्राहकांवर कारवाई करण्याबरोबरच वीज चोरीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात आली आहे. वीज चोरी आढळल्यास सर्वप्रथम संबंधित व्यक्तीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येतो. त्यानंतर त्याच्याकडून दंड व वीज चोरी झालेली रक्कमही वसूल करण्यात येते.