शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचे तत्त्व ग्रहण करा

By admin | Updated: November 30, 2015 01:22 IST

समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले.

बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण : खोब्रागडे यांचे प्रतिपादनआरमोरी : समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. देशातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी संविधान असून संविधानाचे पावित्र टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. ज्या दिवशी संविधानाचे आचरण व पालन प्रत्येक नागरिक करेल त्या दिवशी देश महासत्ता होईल, त्यामुळे संविधानाचे तत्त्व सर्वांनी ग्रहण करून ते आचरणात आणावे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. आरमोरी येथे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्या वतीने तथागत बुद्ध विहारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नागपूर येथील भंते धम्मसारथी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे, संघमित्रा ढोके, अ‍ॅड. कविता मोहरकर, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, मदन मेश्राम उपस्थित होते. यावेळी भंते धम्मसारथी यांनी, धम्माच्या तत्त्वाचे घराघरात पालन करणे आवश्यक आहे. धम्मात अंधश्रद्धा घुसविणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन केले. प्रास्ताविक किशोर सहारे, संचालन पूनम दुर्याेधन यांनी तर आभार रमेश सोरदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)