शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संविधानाचे तत्त्व ग्रहण करा

By admin | Updated: November 30, 2015 01:22 IST

समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले.

बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण : खोब्रागडे यांचे प्रतिपादनआरमोरी : समता, स्वातंत्र, न्याय, बंधुता, करूणा, मैत्री, प्रेम हे तथागत गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. देशातील लोकांच्या न्याय, हक्कासाठी संविधान असून संविधानाचे पावित्र टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. ज्या दिवशी संविधानाचे आचरण व पालन प्रत्येक नागरिक करेल त्या दिवशी देश महासत्ता होईल, त्यामुळे संविधानाचे तत्त्व सर्वांनी ग्रहण करून ते आचरणात आणावे, असे आवाहन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. आरमोरी येथे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळाच्या वतीने तथागत बुद्ध विहारात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नागपूर येथील भंते धम्मसारथी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्मारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. क्रिष्णा गजबे, संघमित्रा ढोके, अ‍ॅड. कविता मोहरकर, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, मदन मेश्राम उपस्थित होते. यावेळी भंते धम्मसारथी यांनी, धम्माच्या तत्त्वाचे घराघरात पालन करणे आवश्यक आहे. धम्मात अंधश्रद्धा घुसविणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन केले. प्रास्ताविक किशोर सहारे, संचालन पूनम दुर्याेधन यांनी तर आभार रमेश सोरदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)