शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

By गेापाल लाजुरकर | Updated: December 27, 2022 20:50 IST

जेरबंद केव्हा करणार?; गडचिरोली तालुक्यातील लोकांमध्ये आक्रोश

गडचिरोली : तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नरभक्षक वाघांचा धुमाकूळ आहे. १२ ते १५ किमीच्या जंगल परिसरात वावरून शेतकरी व अन्य लोकांचा बळी वाघ घेत आहेत. ह्या वाघांनी एवढी दहशत वाढविली की लोकांनी जंगलात जाणेच बंद केले. तेव्हा हल्ले थांबले; परंतु जंगलात न जाताही आता शेतात जाणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांचा बळी घेत आहेत. आता तर चार पिल्ले सांभाळणाऱ्या वाघिणीची भूक एवढी वाढली की  पिलांचे पालनपोषण करण्यासाठी वाघीण लोकांनाच लक्ष्य करून त्यांचे गळे पकडत आहे. त्यामुळे वाघिणीला केव्हा जेरबंद करणार, असा प्रश्नरुपी आक्रोश तालुक्यातील लोकांमध्ये आहे.

२०१९ पासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांची दहशत वाढली असली तरी, गेल्या तीन महिन्यापासून नरभक्षक वाघिणीने तालुक्यातील जेप्रा, दिभना, राजघाटा चेक आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, अमिर्झा, कळमटोला चुरचुरा जंगल परिसरात धुमाकूळ घालून लोकांचा बळी घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून ही वाघीण चार पिलांना जंगलात गुप्त ठिकाणी लपवून ठेवून ती याच भागातील शेतशिवारात आपले भक्ष्य शोधते. नरभक्षक वाघिणीसह अन्य वाघांवर देखरेख ठेवण्यासाठी व लोकांना सतर्क करण्यासाठी वन विभागाने दिभना परिसरात सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली. ही पथके सकाळपासून सायंकाळपर्यंत जंगलात ठाण मांडून असतात. तरीसुद्धा नागरिक जंगलात अथवा जंगलालगतच्या शेतशिवारात जाण्याचा मोह आवरत नाहीत.

परिणामी मनुष्यावरील हल्ले वाढत आहेत. शेवटी शेतकरी सुद्धा करणार तरी काय शेती असल्याने त्यांना प्रत्यक्ष शेतात पिकाची पाहणी अथवा वेगवेगळ्या कामासाठी जावेच लागते. यापूर्वी तर वाघ वाघीण जंगलात येणाऱ्या लोकांवरच हल्ले करीत होते. आता तर शेतशिवारात काम करणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांना यमसदनी पाठवत आहेत. याला जबाबदार कोण वनविभाग की स्वतः शेतकरी हे सुद्धा सांगणे कठीण आहे. कारण जागृती करणे वन विभागाचे काम आहे तर जंगल व शेतीवर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असल्याने त्यांनाही तेथे जाण्यापासून रोखता येत नाही.

टी-६ वाघिणीने घेतले १० बळी

गडचिरोली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटोला, धुंडेशिवणी व चुरचुरा जंगल परिसरात गेल्या सात महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या टी-६ वाघिणीने आतापर्यंत ९ लोकांचा बळी घेतला होता. आंबेटोला येथील घटनेनंतर बळींची संख्या आता १० झाली. बळी गेलेल्यांमध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये कळमटोला येथील २, तर धुंडेशिवणी, चुरचुरा, अमिर्झा, राजगाटा चक, दिभना, आंबेशिवणी, राजगाटा माल व आंबेटोला येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

पोटभर शिकारीसाठी वाघीण झाली आक्रमक

एका वाघासाठी किमान ४५ ते ६० चौ.कि.मी. जंगलक्षेत्र आवश्यक असते, तर मादी वाघ कोणत्याही वाघाच्या क्षेत्रात जाऊ शकते. पिलांसह वावरणारी वाघीण ८ ते १० किमी परिसरात वावरते व भक्ष्य शोधते. दिभना जंगलक्षेत्रात असलेल्या वाघिणीला तेवढे क्षेत्र मिळत नसल्याने. अल्प क्षेत्रातच ती वावरते. याच क्षेत्रात ती भक्ष्य शोधते. चार पिल्ले असल्याने पोटभर शिकार मिळावी यासाठी ती मिळेल त्या प्राण्यांची शिकार करते. ती माणसावरही तुटून पडते.

वाघिणीची दोन वाघांशी संगत

हल्लेखोर टी-६ वाघिणीला जी-१ व जी-१० ह्या दोन वाघांची संगत आहे. जी-१ हा वाघ गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी व धानोरा तालुक्यातील काही भागात वावरतो तर जी-१० हा वाघ गडचिरोली तालुक्यासह आरमोरी तालुक्यातील जंगलात वावरतो.त्याला वडसा वन विभागात टी-५ नावाने ओळखले जाते. दोन वाघ, एक वाघीण व चार पिल्ले असा वाघांचा गोतावळा गडचिरोली तालुक्यातील जंगलात वावरून धुमाकूळ घालत आहे.

वाघिणीला पिलांसह पकडण्याची परवानगी मिळाली आहे; परंतु वाघ पकडणारे ताडोबा व अमरावतीचे पथक उपलब्ध नाही. ती पथके दुसऱ्या ठिकाणी वाघ पकडण्यात व्यस्त आहेत. पिलांसह जेरबंद करणे कठीण असले तरी, पथके उपलब्ध झाल्यानंतर तातडीने वाघिणीला पिलांसह जेरबंद केले जाईल.- डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली