शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

By गेापाल लाजुरकर | Updated: December 27, 2022 20:50 IST

जेरबंद केव्हा करणार?; गडचिरोली तालुक्यातील लोकांमध्ये आक्रोश

गडचिरोली : तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नरभक्षक वाघांचा धुमाकूळ आहे. १२ ते १५ किमीच्या जंगल परिसरात वावरून शेतकरी व अन्य लोकांचा बळी वाघ घेत आहेत. ह्या वाघांनी एवढी दहशत वाढविली की लोकांनी जंगलात जाणेच बंद केले. तेव्हा हल्ले थांबले; परंतु जंगलात न जाताही आता शेतात जाणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांचा बळी घेत आहेत. आता तर चार पिल्ले सांभाळणाऱ्या वाघिणीची भूक एवढी वाढली की  पिलांचे पालनपोषण करण्यासाठी वाघीण लोकांनाच लक्ष्य करून त्यांचे गळे पकडत आहे. त्यामुळे वाघिणीला केव्हा जेरबंद करणार, असा प्रश्नरुपी आक्रोश तालुक्यातील लोकांमध्ये आहे.

२०१९ पासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांची दहशत वाढली असली तरी, गेल्या तीन महिन्यापासून नरभक्षक वाघिणीने तालुक्यातील जेप्रा, दिभना, राजघाटा चेक आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, अमिर्झा, कळमटोला चुरचुरा जंगल परिसरात धुमाकूळ घालून लोकांचा बळी घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून ही वाघीण चार पिलांना जंगलात गुप्त ठिकाणी लपवून ठेवून ती याच भागातील शेतशिवारात आपले भक्ष्य शोधते. नरभक्षक वाघिणीसह अन्य वाघांवर देखरेख ठेवण्यासाठी व लोकांना सतर्क करण्यासाठी वन विभागाने दिभना परिसरात सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली. ही पथके सकाळपासून सायंकाळपर्यंत जंगलात ठाण मांडून असतात. तरीसुद्धा नागरिक जंगलात अथवा जंगलालगतच्या शेतशिवारात जाण्याचा मोह आवरत नाहीत.

परिणामी मनुष्यावरील हल्ले वाढत आहेत. शेवटी शेतकरी सुद्धा करणार तरी काय शेती असल्याने त्यांना प्रत्यक्ष शेतात पिकाची पाहणी अथवा वेगवेगळ्या कामासाठी जावेच लागते. यापूर्वी तर वाघ वाघीण जंगलात येणाऱ्या लोकांवरच हल्ले करीत होते. आता तर शेतशिवारात काम करणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांना यमसदनी पाठवत आहेत. याला जबाबदार कोण वनविभाग की स्वतः शेतकरी हे सुद्धा सांगणे कठीण आहे. कारण जागृती करणे वन विभागाचे काम आहे तर जंगल व शेतीवर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असल्याने त्यांनाही तेथे जाण्यापासून रोखता येत नाही.

टी-६ वाघिणीने घेतले १० बळी

गडचिरोली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटोला, धुंडेशिवणी व चुरचुरा जंगल परिसरात गेल्या सात महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या टी-६ वाघिणीने आतापर्यंत ९ लोकांचा बळी घेतला होता. आंबेटोला येथील घटनेनंतर बळींची संख्या आता १० झाली. बळी गेलेल्यांमध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये कळमटोला येथील २, तर धुंडेशिवणी, चुरचुरा, अमिर्झा, राजगाटा चक, दिभना, आंबेशिवणी, राजगाटा माल व आंबेटोला येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

पोटभर शिकारीसाठी वाघीण झाली आक्रमक

एका वाघासाठी किमान ४५ ते ६० चौ.कि.मी. जंगलक्षेत्र आवश्यक असते, तर मादी वाघ कोणत्याही वाघाच्या क्षेत्रात जाऊ शकते. पिलांसह वावरणारी वाघीण ८ ते १० किमी परिसरात वावरते व भक्ष्य शोधते. दिभना जंगलक्षेत्रात असलेल्या वाघिणीला तेवढे क्षेत्र मिळत नसल्याने. अल्प क्षेत्रातच ती वावरते. याच क्षेत्रात ती भक्ष्य शोधते. चार पिल्ले असल्याने पोटभर शिकार मिळावी यासाठी ती मिळेल त्या प्राण्यांची शिकार करते. ती माणसावरही तुटून पडते.

वाघिणीची दोन वाघांशी संगत

हल्लेखोर टी-६ वाघिणीला जी-१ व जी-१० ह्या दोन वाघांची संगत आहे. जी-१ हा वाघ गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी व धानोरा तालुक्यातील काही भागात वावरतो तर जी-१० हा वाघ गडचिरोली तालुक्यासह आरमोरी तालुक्यातील जंगलात वावरतो.त्याला वडसा वन विभागात टी-५ नावाने ओळखले जाते. दोन वाघ, एक वाघीण व चार पिल्ले असा वाघांचा गोतावळा गडचिरोली तालुक्यातील जंगलात वावरून धुमाकूळ घालत आहे.

वाघिणीला पिलांसह पकडण्याची परवानगी मिळाली आहे; परंतु वाघ पकडणारे ताडोबा व अमरावतीचे पथक उपलब्ध नाही. ती पथके दुसऱ्या ठिकाणी वाघ पकडण्यात व्यस्त आहेत. पिलांसह जेरबंद करणे कठीण असले तरी, पथके उपलब्ध झाल्यानंतर तातडीने वाघिणीला पिलांसह जेरबंद केले जाईल.- डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली