शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात ९९ नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:14 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला.

ठळक मुद्दे७५२ माता जोखीमपूर्ण : ४६ उपजत तर ५३ बालकांनी अर्भकावस्थेत सोडला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला. मातेच्या सुदृढपणाचा अभाव आणि गर्भावस्थेतील बालकाच्या कुपोषणासोबतच काही प्रसंगात योग्य उपचारांचा अभाव ही या बालमृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत.जिल्ह्यातील देसाईगंज वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवेअंतर्गत विविध सुविधा पुरविल्या जातात. याअंतर्गत ग्रामीण भागात गेल्या ७ महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आरोग्य विभागाने विविध शिबिरे आणि गरोदर मातांच्या तपासणी व उपचारावर ३३ लाख ५२ हजार रुपये खर्च केल्याचे दिसून येते. मात्र यादरम्यान ४६ बालकांचा उपजतच तर ५३ बालकांचा अर्भकावस्थेत असताना मृत्यू झाला. याशिवाय ७ गरोदर मातांना जीव गमवावा लागला. गर्भावस्थेत आवश्यक असलेल्या पोषक घटकांअभावी महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण बरेच आहे. परिणामी वेळेवर योग्य तो पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे गर्भातील बाळाला मातेच्या आहारातून मिळणाऱ्या पोषक घटकांपासून वंचित राहावे लागून त्याची योग्य प्रकारे वाढ होत नाही. गर्भातच त्याचे असे कुपोषण होत असल्याने तो सुदृढ होत नाही. पोटातील बाळ किती सुदृढ आहे याची वेळोवेळी तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे असते. पण दुर्गम भागात या तपासण्या होत नाही. त्यामुळे बाळाचा उपजत अवस्थेतच मृत्यू होतो. गेल्या सात महिन्यात यामुळेच ४६ बालक दगावले आहेत.१८६ शिबिरातून तपासणी व उपचारगर्भवती महिलांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालक तथा त्यांच्या मातांची तपासणी करण्यासाठी एप्रिल ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ४४० शिबिरांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १८६ शिबिरे घेण्यात आली. कुरखेडा आणि गडचिरोली तालुका वगळता इतर सर्व तालुके ही शिबिरे घेण्यात मागे पडले. सिरोंचा तालुक्यात तर सात महिन्यात एकही शिबिर झाले नाही. एटापल्ली तालुक्यात अवघे २ तर कोरची तालुक्यात ४ शिबिरे झाली. संबंधित तालुका आरोग्य अधिकाºयांचा ढिसाळपणा हेसुद्धा बाल व मातामृत्यू मागील एक कारण ठरत आहे.एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणात एटापल्ली तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येते. या तालुक्यात गेल्या सात महिन्यात १२ बालकांचा उपजत मृत्यू तर १८ बालकांचा अर्भकावस्थेत मृत्यू झाला आहे. याशिवाय २ मातांचाही मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यात ६ उपजत तर ७ अर्भक मृत्यू झाले आहेत. तसेच एका मातेलाही जीव गमवावा लागला. या तालुक्यात आरोग्य सेवेत सुधारणा करण्यास वाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूGadchiroliगडचिरोली