शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सात महिन्यात ९९ नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 22:14 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला.

ठळक मुद्दे७५२ माता जोखीमपूर्ण : ४६ उपजत तर ५३ बालकांनी अर्भकावस्थेत सोडला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालावधीत ९९ बालकांनी प्राण सोडला. मातेच्या सुदृढपणाचा अभाव आणि गर्भावस्थेतील बालकाच्या कुपोषणासोबतच काही प्रसंगात योग्य उपचारांचा अभाव ही या बालमृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत.जिल्ह्यातील देसाईगंज वगळता उर्वरित ११ तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवेअंतर्गत विविध सुविधा पुरविल्या जातात. याअंतर्गत ग्रामीण भागात गेल्या ७ महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास आरोग्य विभागाने विविध शिबिरे आणि गरोदर मातांच्या तपासणी व उपचारावर ३३ लाख ५२ हजार रुपये खर्च केल्याचे दिसून येते. मात्र यादरम्यान ४६ बालकांचा उपजतच तर ५३ बालकांचा अर्भकावस्थेत असताना मृत्यू झाला. याशिवाय ७ गरोदर मातांना जीव गमवावा लागला. गर्भावस्थेत आवश्यक असलेल्या पोषक घटकांअभावी महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण बरेच आहे. परिणामी वेळेवर योग्य तो पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे गर्भातील बाळाला मातेच्या आहारातून मिळणाऱ्या पोषक घटकांपासून वंचित राहावे लागून त्याची योग्य प्रकारे वाढ होत नाही. गर्भातच त्याचे असे कुपोषण होत असल्याने तो सुदृढ होत नाही. पोटातील बाळ किती सुदृढ आहे याची वेळोवेळी तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे असते. पण दुर्गम भागात या तपासण्या होत नाही. त्यामुळे बाळाचा उपजत अवस्थेतच मृत्यू होतो. गेल्या सात महिन्यात यामुळेच ४६ बालक दगावले आहेत.१८६ शिबिरातून तपासणी व उपचारगर्भवती महिलांची आणि ० ते ६ महिने वयोगटातील बालक तथा त्यांच्या मातांची तपासणी करण्यासाठी एप्रिल ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ४४० शिबिरांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १८६ शिबिरे घेण्यात आली. कुरखेडा आणि गडचिरोली तालुका वगळता इतर सर्व तालुके ही शिबिरे घेण्यात मागे पडले. सिरोंचा तालुक्यात तर सात महिन्यात एकही शिबिर झाले नाही. एटापल्ली तालुक्यात अवघे २ तर कोरची तालुक्यात ४ शिबिरे झाली. संबंधित तालुका आरोग्य अधिकाºयांचा ढिसाळपणा हेसुद्धा बाल व मातामृत्यू मागील एक कारण ठरत आहे.एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणात एटापल्ली तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येते. या तालुक्यात गेल्या सात महिन्यात १२ बालकांचा उपजत मृत्यू तर १८ बालकांचा अर्भकावस्थेत मृत्यू झाला आहे. याशिवाय २ मातांचाही मृत्यू झाला आहे. धानोरा तालुक्यात ६ उपजत तर ७ अर्भक मृत्यू झाले आहेत. तसेच एका मातेलाही जीव गमवावा लागला. या तालुक्यात आरोग्य सेवेत सुधारणा करण्यास वाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूGadchiroliगडचिरोली