शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

बंदीच्या जिल्ह्यात दारूचे ९०० गुन्हे

By admin | Updated: January 29, 2015 23:05 IST

शासनाने २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी केली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री हा गुन्हा ठरविला जातो. यांतर्गत गडचिरोली पोलिसांनी अवैद्य दारूविक्रेत्यांवर छापा टाकून

२८२ आरोपींना अटक : १७ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांचे दुर्लक्षगडचिरोली : शासनाने २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी केली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री हा गुन्हा ठरविला जातो. यांतर्गत गडचिरोली पोलिसांनी अवैद्य दारूविक्रेत्यांवर छापा टाकून २०१०-११ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीपर्यंत ९१० गुन्ह्यांची नोंद केली आहे. यामध्ये २८२ आरोपींना अटक करून १७.४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. दारूबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क विभागावर सोपविली. मात्र या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीचे तिनतेरा वाजले आहे. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जेवढी दारू मिळत नाही, त्यापेक्षा अधिक दारू गडचिरोली जिल्ह्यात विकल्या जाते. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये केवळ दारू दुकानातच दारू विकली जाते. मात्र या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळात अवैध दारूची दुकाने थाटण्यात आली आहेत व ही दुकाने पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत. काही दुकानदारांनी तर बिअरबारलाही लाजवेल अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्यासाठी आगावूचा चार्जही आकारला जात आहे. यामुळे दारूविक्रेते गब्बर होत चालले असले तरी अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे दारू बंदीवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत. गल्लीबोळात सुरू असलेल्या दारू दुकानांमुळे त्रस्त झालेल्या काही गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात दारूविक्री करीत असल्याचे आढळून आल्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला फोन करून याबाबतची माहिती देतात. गावकऱ्यांच्या दबावाखातर पोलीस संबंधित दारूविक्रेत्याला पोलीस स्टेशनमध्ये नेतात. मात्र त्याच्यावर योग्य कलमा लावल्या जात नसल्याने एका दिवसातच त्याची सुटका होते. एवढेच नाही तर पोलीस दारूविक्रेत्याला एखाद्या व्हीआयपी व्यक्तीप्रमाणे वागणूक देत असल्याने दारूविक्रेत्यांची हिंमत वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षांत ९१० दारूचे गुन्हे घडले आहेत. या पाच वर्षांत सुमारे २८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून सुमारे १७.०४ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यांवरून गडचिरोली जिल्ह्यातील दारूविक्रीची व्याप्ती लक्षात येते. (नगर प्रतिनिधी)