शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:24 IST

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या वार्षिक सरासरीच्या (अपेक्षित पावसाच्या) सुमारे ८८ टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिना संपायला आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. कधीकधी याही महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे११९४.१ मिमी पाऊस पडला : पावसाचा जोर सुरूच; काही तालुके मात्र माघारलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या वार्षिक सरासरीच्या (अपेक्षित पावसाच्या) सुमारे ८८ टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिना संपायला आणखी एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. कधीकधी याही महिन्यात मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे यावर्षी पाऊस वार्षिक सरासरी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.देशभरात यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत अगदी सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यंतरीचा १० ते १५ दिवसांचा कालावधी वगळता अगदी जून महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. दररोज पडणाºया पावसामुळे शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. तर धान उत्पादक शेतकरी मात्र या पावसामुळे समाधानी आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १३५४.७ मिमी सरासरी पाऊस पडतो. २७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सुमारे ११९४.१ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८८.१ टक्के पाऊस पडला असून केवळ १२ टक्के पाऊस पडायचा आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळा समजला जातो. ३० सप्टेंबरला पुन्हा एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. १ जून ते २७ आॅगस्ट या कालावधीपर्यंत सरासरी १०८१.२ मिमी पाऊस पडतो. यावर्षी २७ आॅगस्टपर्यंत सुमारे ११९४.१ मिमी पाऊस पडला आहे. २७ आॅगस्टपर्यंत पडणाºया सरासरी पावसाच्या ११०.४ मिमी पाऊस झाला आहे. सातत्याने पडणाºया पावसाचा परिणाम कापूस, सोयाबीन, तूर पिकावर होण्यास सुरुवात झाली आहे. सातत्याने असलेल्या ओलाव्यामुळे या पिकांची वाढ खुंटली आहे. धानपिकाला मात्र पावसाचा फायदा होत आहे. अपवाद वगळता बहुतांश शेतकऱ्यांचे धानपीक हिरवेगार आहे. सर्वच तलाव, बोड्या पूर्ण भरल्या आहेत. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.अहेरी, सिरोंचा, भामरागड तालुक्यांनी गाठली सरासरीयावर्षी अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांनी वार्षिक सरासरी २७ आॅगस्टपर्यंत गाठली आहे. अहेरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १३२०.७ मिमी पाऊस पडतो. यावर्षी २७ आॅगस्टपर्यंत १४८८.२ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या ११२.७ मिमी पाऊस झाला आहे. तसेच सिरोंचा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ११४९.७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी १४८४.७ मिमी पडला आहे. वार्षिक सरासरीच्या १२९.१ टक्के पाऊस झाला. भामरागड तालुक्यात ३० सप्टेंबरपर्यंत १३०३.६ मिमी पाऊस अपेक्षित आहे. या तालुक्यात प्रत्यक्षात १५०७.९ मिमी पाऊस पडला आहे. वार्षिक पावसाच्या ११५.७ टक्के पाऊस झाला आहे. मुलचेरा तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या ९९.९ टक्के पाऊस पडला आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तरीही याही तालुक्यातील पावसाची आकडेवारी ७० टक्केपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत याही तालुक्यांमध्ये सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.सरासरीच्या अधिक पावसाची शक्यतासप्टेंबर महिना संपायला आणखी पूर्ण महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. या महिनाभरात पाऊस झाल्यास सरासरी पावसाच्या १२० ते १३० टक्के पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.