शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

८५४ सिंचन विहिरी अपूर्ण

By admin | Updated: November 3, 2015 00:38 IST

वन कायद्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प रखडले आहेत.

डिसेंबरपासून होणार सुरुवात : बांधकाम पूर्ण करण्यासाठी २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंतचा अल्टीमेटमलोकमत विशेष

गडचिरोली : वन कायद्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प रखडले आहेत. दुष्काळावर मात करून सिंचन सुविधा वाढविण्यासाठी राज्य शासनाने नरेगातून सिंचन विहीर बांधकामाचा धडक कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही नरेगाअंतर्गत ८५४ सिंचन विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. या सिंचन विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने २९ फेब्रुवारी २०१६ तारखेचा अंतिम अल्टीमेटम प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचाली वाढल्या असून अपूर्ण सिंचन विहिरींचे काम डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत दरवर्षी शेतकरी लाभार्थ्यांना २ लाख ९० हजार रूपयांची १०० टक्के अनुदानावर विहीर बांधून दिल्या जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सन २००८-०९ पासून २०१४-१५ पर्यंत जिल्हा परिषदेने एकूण १ हजार ३७० वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूर केल्या. यापैकी आतापर्यंत बाराही तालुक्यात ५१६ सिंचन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. तर ८५४ सिंचन विहिरी अपूर्ण आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नरेगाअंतर्गत जिल्ह्याला दरवर्षी लाखो रूपयांचे अनुदान सिंचन विहीर बांधकामासाठी दिला जातो. मात्र प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात सिंचन विहीर बांधकामाची गती मंदावली. परिणामी अपूर्ण सिंचन विहिरींचा अनुशेष कायम राहिला. विभागीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा सभेत ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाची गती वाढवून विहित वेळेत सिंचन विहीर बांधकाम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले. त्यामुळे आता नरेगाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक या कामात गतीने भिडले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)कार्यशाळेतून प्रशासन गतिमानरोजगार हमी योजनेंतर्गत अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बाराही तालुक्यात कार्यशाळा कार्यक्रम आखला. २० ते ३१ आॅक्टोपर्यंत कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व एटापल्ली या नऊ तालुक्यात कार्यशाळा पार पडल्या आहेत. ४ व ५ आॅक्टोबर रोजी उर्वरित अहेरी, सिरोंचा, भामरागड या तीन तालुक्यात कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत प्रशासकीय अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, कर्मचारी व लाभार्थी यांच्यामध्ये सिंचन विहीर बांधकामाविषयी चर्चा करण्यात येत आहे.जि. प. सीईओंचा कारवाईचा इशारारोजगार हमी योजनेंतर्गत अपूर्ण असलेल्या ८५४ सिंचन विहिरींचे बांधकाम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २९ फेब्रुवारी २०१६ पूर्वी पूर्ण करावे, असे सक्त निर्देश जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. सिंचन विहिरीचे बांधकाम विहीत वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सीईओ संपदा मेहता यांनी दिला असून सिंचन विहीर बांधकामासाठी मजूर मिळत नाही, ही सबब अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढे करू नये, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट बजाविले आहे.६१४.७२ लाखांचा खर्चंमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ८५४ अपूर्ण विहीर बांधकामावर २०१५-१६ यावर्षात एकूण ६१४.७२ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये मजुरांच्या मजुरीवर २२८.८७ लाख व बांधकाम साहित्यावर ३८५.८५ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. बांधकामाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ८५४ सिंचन विहिरीच्या मजुरीवर ४५४.३९ व साहित्य खरेदीवर ८३८.८ लाख रूपयांचा खर्च झाला आहे.