शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना 75 काेटींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 23:02 IST

काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली. नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे गडचिराेली जिल्ह्यातील  शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या शेतात दाेन ते तीनवेळा पुराचे पाणी शिरले. या शेतकऱ्यांना सुमारे ७५ काेटी २९ लाख रुपयांची मदत शासनामार्फत प्राप्त झाली आहे. मदतीचे वितरण तहसीलमधून केली जात आहे.पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्याला झाेडपून काढले. तसेच मध्य प्रदेश व विदर्भातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणांचे पाणी वैनगंगा नदीत साेडण्यात आले. याच कालावधीत प्राणहिता व गाेदावरी नदीलाही पूर आला. खरीप पिकांची नुकतीच पेरणी झाली हाेती आणि पुराचा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली.नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. या निधीची वितरण तहसील स्तरावरून केले जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमासुद्धा झाली आहे.  काही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा हाेण्यास अडचण जात आहे.

काही शेतकऱ्यांच्या येरझारा  

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याची समस्या असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. असे शेतकरी बँक, तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहेत. मदतीची    रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. अशा शेतकऱ्यांची दिवाळी गाेड हाेणार आहे.

चामाेर्शी तालुक्याला सर्वाधिक मदत चामाेर्शी हा जिल्ह्यातील सर्वात माेठा तालुका आहे. या तालुक्याच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. या नद्यांना पूर आल्याने चामाेर्शी तालुक्यातील ११ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ काेटी १६ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना दुप्पट लाभनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने २२ ऑगस्ट २०२२ राेजी शासन निर्णय काढला आहे. यात दुप्पट मदत दिली जाणार आहे. काेरडवाहू शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये देण्यात आले. ओलिताखालील शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये देण्यात आले.पूर्वी दाेन हेक्टरपर्यंतच मदत दिली जात हाेती. आता मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती