शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
4
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
5
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
6
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
7
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
8
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
9
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
10
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
11
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
12
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
13
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
14
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
15
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
16
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
17
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
18
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
19
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
20
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?

पूरग्रस्त शेतकऱ्यांना 75 काेटींचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 23:02 IST

काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली. नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे गडचिराेली जिल्ह्यातील  शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या शेतात दाेन ते तीनवेळा पुराचे पाणी शिरले. या शेतकऱ्यांना सुमारे ७५ काेटी २९ लाख रुपयांची मदत शासनामार्फत प्राप्त झाली आहे. मदतीचे वितरण तहसीलमधून केली जात आहे.पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने जिल्ह्याला झाेडपून काढले. तसेच मध्य प्रदेश व विदर्भातही मुसळधार पाऊस झाल्याने धरणांचे पाणी वैनगंगा नदीत साेडण्यात आले. याच कालावधीत प्राणहिता व गाेदावरी नदीलाही पूर आला. खरीप पिकांची नुकतीच पेरणी झाली हाेती आणि पुराचा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते, तर काहींचे राेवणे झाले हाेते. सतत तीन ते चारवेळा पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक पूर्णपणे वाहून गेले. काही शेतकऱ्यांच्या धानाच्या बांध्यांमध्ये पुराचा गाळ साचला. या गाळात धान पीक नष्ट झाले. काही शेतकऱ्यांना दाेन ते तीनवेळा धानाची राेवणी करावी लागली.नुकसानग्रस्त शेतकरी निधीची प्रतीक्षा करीत हाेते. आठ दिवसांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. या निधीची वितरण तहसील स्तरावरून केले जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमासुद्धा झाली आहे.  काही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा हाेण्यास अडचण जात आहे.

काही शेतकऱ्यांच्या येरझारा  

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याची समस्या असल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. असे शेतकरी बँक, तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे येरझारा मारत असल्याचे दिसून येत आहेत. मदतीची    रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. अशा शेतकऱ्यांची दिवाळी गाेड हाेणार आहे.

चामाेर्शी तालुक्याला सर्वाधिक मदत चामाेर्शी हा जिल्ह्यातील सर्वात माेठा तालुका आहे. या तालुक्याच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेच्या अनेक उपनद्या आहेत. या नद्यांना पूर आल्याने चामाेर्शी तालुक्यातील ११ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ काेटी १६ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना दुप्पट लाभनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने २२ ऑगस्ट २०२२ राेजी शासन निर्णय काढला आहे. यात दुप्पट मदत दिली जाणार आहे. काेरडवाहू शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये देण्यात आले. ओलिताखालील शेतीचे नुकसान झाल्यास पूर्वी प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढी मदत दिली जात हाेती. त्यात वाढ करून यावर्षी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये देण्यात आले.पूर्वी दाेन हेक्टरपर्यंतच मदत दिली जात हाेती. आता मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती