शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

राज्यातील ७३,३८४ कुटुंबांचे धूरमुक्त स्वयंपाकाचे स्वप्न धूसर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:08 IST

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (आकांक्षित जिल्हे) विस्तारित ग्रामस्वराज अभियान राबविले जात आहे. या अभियानात चारही जिल्ह्यात ‘उज्ज्वला’ योजनेतून गॅस कनेक्शन वाटण्याचे उद्दिष्ट ४८.५४ टक्के पूर्ण झाले आहे. अजूनही ७३ हजार ३८४ कुटुंबांना धूरयुक्त स्वयंपाकातून मुक्ती मिळालेली नाही.

ठळक मुद्दे४८ टक्के लक्ष्यपूर्ती राज्यातल्या चार आकांक्षित जिल्ह्यातील स्थिती

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील ११५ मागास जिल्ह्यांत मोडणाऱ्या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये (आकांक्षित जिल्हे) विस्तारित ग्रामस्वराज अभियान राबविले जात आहे. या अभियानात चारही जिल्ह्यात ‘उज्ज्वला’ योजनेतून गॅस कनेक्शन वाटण्याचे उद्दिष्ट ४८.५४ टक्के पूर्ण झाले आहे. अजूनही ७३ हजार ३८४ कुटुंबांना धूरयुक्त स्वयंपाकातून मुक्ती मिळालेली नाही. नंदूरबार जिल्हा उद्दिष्टपूर्तीत सर्वाधिक पिछाडीवर आहे.गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद आणि नंदूरबार या राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये १ जूनपासून विस्तारित ग्रामस्वराज्य अभियान राबविले जात आहे. येत्या १५ आॅगस्टपर्यंत सदर जिल्ह्यांमध्ये १ लाख ४२ हजार ६२५ कुटुंबांमध्ये नवीन गॅस कनेक्शन वितरित केले जाणार होते. पैकी गेल्या दोन महिन्यात ६९ हजार २४१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले. योजनेचा कालावधी १५ दिवस शिल्लक आहे. उद्दीष्टपूर्तीसाठी ७३ हजार ३८४ कुटुंबांना कनेक्शन द्यावे लागणार आहे. अंत्योदय योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील सर्व कुटुंब तसेच वनवासी (वनालगत राहणाऱ्या गावातील) लोकांना हे गॅस कनेक्शन दिले जात आहे. मात्र योजनेची गती पाहता निर्धारित कालावधीत उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्यता कमीच आहे.

सबसिडीतून कापणार गॅस व शेगडीचे पैसेया योजनेतून मोफत गॅस कनेक्शन दिले जात असल्याचा देखावा केला जात असला तरी प्रत्यक्षात सिलिंडरमधील गॅस, शेगडी, रेग्युलेटर आदींचे पैसे संबंधित कनेक्शनधारकाला दिल्या जाणाऱ्या सबसिडीतून परस्पर कापले जाणार आहेत. केवळ सुरूवातीची डिपॉझिट रक्कम १६०० रुपये, पाईप आणि कनेक्शन जोडणीचे २०० रुपये एवढेच मोफत आहे.

दुर्गम भागात रिफिलिंग कसे करणार?अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन कुटुंबातील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन दिले जात आहे. वनालगतच्या गावातील, दुर्गम भागातल्या गावांमधील कुटुंब लाभार्थी आहेत. सुरूवातीला त्यांना भरलेले सिलिंडर दिले जात असले तरी एकदा सिलिंडर संपल्यानंतर रिफिलिंग केलेले दुसरे सिलिंडर मिळण्याची सोय गावाच्या जवळपास कुठेच नाही. त्यामुळे लाभार्थ्यांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ शकते. अशा स्थितीत ही योजना कितपत यशस्वी ठरणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर