शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
2
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
3
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
4
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
5
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
6
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
7
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
8
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
9
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
10
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
11
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
12
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
13
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
14
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
15
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
16
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
17
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
18
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
19
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
20
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
Daily Top 2Weekly Top 5

७०० वर सिंचन विहिरींची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:24 IST

शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन उत्पादन वाढावे, जेणे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या उद्देशाने शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनरेगा अंतर्गत जिल्ह्याला दीड हजार विहिरींचे उद्दिष्ट : कुशल कामाच्या निधीअभावी २७० विहिरींची कामे रखडली

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतीला सिंचन सुविधा निर्माण होऊन उत्पादन वाढावे, जेणे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या उद्देशाने शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी बांधण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत ७२४ सिंचन विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत असून केंद्र शासनाच्या कुशल कामाच्या निधीअभावी २७० सिंचन विहिरींचे काम तुर्तास रखडले असल्याची माहिती हाती आली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ व २०१७-१८ अशी दोन वर्ष मिळून एकूण १ हजार ५०० सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये अहेरी तालुक्याला १५२, आरमोरी १४७, भामरागड ८५, चामोर्शी १६२, देसाईगंज ५५, धानोरा १४५, एटापल्ली १५२, गडचिरोेली १४५, कोरची ११५, कुरखेडा १४२, मुलचेरा ११५ व सिरोंचा तालुक्यात ८५ विहिरींचा समावेश आहे. १ एप्रिल २०१६ ते २५ एप्रिल २०१८ पर्यंत १ हजार ५०० पैकी ७९० सिंचन विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले.अहेरी तालुक्यात १२७ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले असून ५१ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. आरमोरी तालुक्यात १५७ विहिरी पूर्ण झाल्या असून १७० विहिरींचे काम अर्धवट स्थितीत आहे. भामरागड तालुक्यात २६ विहिरींचे काम पूर्ण झाले असून २८ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहेत. चामोर्शी तालुक्यात ३५ विहिरी पूर्ण करण्यात आल्या असून ७ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहे. देसाईगंज तालुक्यात १४८ विहिरींचे काम पूर्ण झाले असून २८ विहिरी अपूर्ण स्थितीत आहे. धानोरा तालुक्यात २४ विहिरी पूर्ण झाल्या असून तब्बल ८३ विहिरींचे काम अपूर्ण स्थितीत आहे. एटापल्ली तालुक्यात ४३ विहिरी पूर्ण झाल्या असून ५२ विहिरी अपूर्ण स्थितीत आहे. गडचिरोली तालुक्यात ३४ कामे पूर्ण झाली असून ४४ कामे अपूर्ण स्थितीत आहे. कोरची तालुक्यात ५९ विहिरी पूर्ण झाल्या असून ८७ विहिरी अपूर्ण स्थितीत आहे.कुरखेडा तालुक्यात ६८ विहिरी पूर्ण झाल्या असून १०० विहिरी अर्धवट स्थितीत आहे. मुलचेरा तालुक्यात २७ विहिरींचे काम पूर्ण झाले असून १८ कामे अपूर्ण स्थितीत आहेत. सिरोंचा तालुक्यात केवळ तीन विहिरींचे काम अपूर्ण असून ४२ विहिरींचे काम आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.केंद्र शासनाकडून सदर सिंचन विहिरींच्या कुशल कामाचा निधी अप्राप्त असल्याने २७० विहिरींचे काम थंडबस्त्यात आहे. या २७० विहिरींमध्ये आरमोरी तालुक्यातील सर्वाधिक १०३, अहेरी २४, चामोर्शी ११, देसाईगंज १८, धानोरा २८, एटापल्ली १६, गडचिरोली ११, कोरची २७, कुरखेडा २८, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात दोन विहिरींचे काम थंडबस्त्यात आहे. सद्य:स्थितीत ९५ विहिरींच्या कामांवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च झाला आहे. २५ ते ५० टक्क्यापेक्षा जास्त निधी खर्च झालेल्या विहिरींची संख्या १८५ आहे.रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या पाच-सात वर्षांत नरेगाच्या योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी बांधण्यात आल्या. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतूनही शेकडो विहिरींचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर विहीर बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य वाजवी दरात व सहज आणि वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचे बांधकाम गतीने पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतात. यासंदर्भात संबंधित प्रशासकीय यंत्रणेने तोडगा काढण्याची गरज आहे.केंद्र शासनाने सिंचन विहिरीच्या कुशल कामाचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सिंचन विहिरींचे काम पूर्ण करता येईल, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांनी केली आहे. यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.५७ सिंचन विहिरी राहणार अपूर्णचरोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार ५०० सिंचन विहिरींपैकी जिल्ह्यातील ५७ सिंचन विहिरींचे काम विविध कारणांमुळे कायमस्वरूपी थंडबस्त्यात राहण्याची शक्यता आहे. यामध्ये नऊ सिंचन विहिरींना खोदकामादरम्यान दगड लागला. यामध्ये अहेरी तालुक्यातील एक, चामोर्शी एक, एटापल्ली दोन, धानोरा दोन व कुरखेडा तालुक्यातील तीन विहिरींचा समावेश आहे. लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे १३ सिंचन विहिरींचे काम सुरू होऊ शकले नाही. १९ सिंचन विहिरी नगर पंचायत क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे या सिंचन विहिरींचे भवितव्य अंधारात आहे. तब्बल १६ सिंचन विहिरींचे काम विविध कारणांमुळे थंडबस्त्यात पडले आहे. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ५७ सिंचन विहिरींचे काम पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.काम पूर्ण करण्यास ३० जूनपर्यंत मुदतमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात हजारो सिंचन विहिरींचे काम मंजूर करून ते हाती घेण्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणेमार्फतही लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून विहिरींचे बांधकाम गतीने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून अपूर्णस्थितीत असलेल्या ७२४ सिंचन विहिरींचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडून दर आठवड्याला विहिरींच्या बांधकामाच्या स्थितीची माहिती घेतली जात आहे. यासाठी नरेगाच्या आयुक्तालय कार्यालयाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नरेगाच्या नागपूर विभागाच्या आयुक्तांचे पत्र जि. प. च्या प्रशासकीय यंत्रणेला नुकतेच प्राप्त झाले आहे.