शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

६९६ घरांची पडझड

By admin | Updated: September 9, 2014 23:27 IST

१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर

सात जण दगावले : ३९ गोठ्यांची पडझड, १५ लाखांचे नुकसानगडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर पुरामुळे दोन अशा एकूण ७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अतिवृष्टीमुळे ६६ जनावरेही दगावली आहेत. एकूणच पावसाच्या महाप्रलयामुळे घरांची पडझड व जनावरांची मिळून एकूण १५ लाख ११ हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात संततधार पावसाने जिल्हाभरात कहर केला. यामुळे भामरागड, सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. परिणामी या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाताहात झाली. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन जिल्ह्यात एकूण २४ जनावरे दगावली. यामुळे जनावर मालकांचे १ लाख १४ हजार ४५० रूपयाचे नुकसान झाले. याच महिन्यात जिल्ह्यात ७ गोठ्यांची पूर्णत: व १११ गोठ्यांची अंशत: असे एकूण ११८ गोठ्यांची तसेच घरांची पडझड झाली. यामुळे १ लाख २० हजार ४९० रूपयाचे नुकसान झाले. आॅगस्ट महिन्यात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात एकूण ३० जनावरे दगावली. यामुळे जनावर मालकांचे ११ लाख ६ हजार ९५० रूपयाचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात एकूण ३६२ घरांची तसेच गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ११ लाख ५७ हजार ६६० रूपयाचे नुकसान झाले. तसेच पुरात वाहून गेलेल्या दोघाजणांना आपला जीव गमवावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक कुरखेडा तालुक्यात १०८ घरांची पडझड झाली. तर त्या खालोखाल मुलचेरा तालुक्यात ८८ घरांची पडझड झाली. कोरची तालुक्यात ४७ घरांची पडझड झाली. अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन ११ जण जखमी झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे गडचिरोली तालुक्यात ९ गावातील ४० घरांची अंशत: पडझड झाली. धानोरा तालुक्यातील २५ गावातील ४३ घरांची अंशत: पडझड झाली. देसाईगंज तालुक्यात ६, आरमोरी तालुक्यात ३६, चामोर्शी तालुक्यात १९४, अहेरी तालुक्यात ३३, भामरागड तालुक्यात १ घराची अंशत: पडझड झाली. अतिवृष्टीमुळे पूर्णत: घरांची पडझड झालेल्यांमध्ये धानोरा तालुक्यातील ७, देसाईगंज तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील २७ घरांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरमालक तसेच जनावर मालकांना आणि मृतकांच्या कुटुंबीयांना व जखमी झालेल्या इसमांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तालुका व गावपातळीवरील सर्व महसूल कर्मचाऱ्यांना तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. याअनुषंगाने त्या-त्या तालुक्यातील व गावपातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी अतिवृष्टीमुळे नुकसानीचे सर्व्हेक्षण करीत आहेत. सदर नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाला पाठविण्याची कारवाई सुरू आहे.अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचे धोरण राज्य शासनाकडून राबविले जाते. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)