शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:54 AM

जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.

ठळक मुद्देवीज गळतीला बसणार आळा : उच्चदाब वितरण प्रणाली योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.कृषीपंपाला आवश्यक तेवढा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावून देण्यासाठी राज्य शासनाने ‘उच्चदाब वितरण प्रणाली’ योजना सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत शेतकºयांच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी (११ केव्ही) टाकली जाणार आहे. त्यामुळे लघुदाब वाहिणीची गरज राहणार नाही. शनिवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पारडी येथील शेतकºयांच्या शेतातील कृषी पंपाची कळ दाबून या योजनेचा शुभारंभ केला. जिल्ह्यात मार्च २०१८ अखेर कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या ८९९ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. ०.६ किमीपर्यंत वाहिणी लागणाºया ६७१ अर्जदारांच्या जोडण्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून केल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र डीपी बसविली जाणार आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुध्दा प्रगतीवर आहेत. गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील भास्कर शितकुरा गंडाटे तसेच चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई देवतळे यांच्या शेतात उच्चदाब वाहिणीने वीज पुरवठा करण्यात आला आहे. पारडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वत:च्या हाताने कृषीपंप सुरू करून योजनेचा शुभारंभ केला. यावेळी गडचिरोली महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.२२८ शेतकऱ्यांना मिळणार सौरप्रणालीज्या शेतकऱ्यांचे शेत मुख्य लाईनपासून ०.६ किमीपेक्षा अधिक अंतरावर आहे, अशा २२८ शेतकºयांना सौरऊर्जा प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांना बिनाखर्ची वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.एका ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास अडीच लाख रूपये आहे. एवढ्या किमतीचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत जवळजवळ आहे, अशा दोनपेक्षा अधिक शेतकºयांना एकाच रोहित्रावरून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी मीटरसाठी डिमांड भरून त्यांना आजपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही, अशा शेतकऱ्यांना यानंतर पुढे उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा केला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्यांला वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज